नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस म्हणाले


मुंबई : बिहार निवासनुकी (बिहार व्हिडिओ) सगळे मुद्दे बाजुला पडले आहेत, विकास आणि सुशासन हाच प्रमुख मुद्दा ठरला. मोदीजी आणि नितीश कुमार यांचा चेहरा हाच प्रमुख मुद्दा ठरल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. यावेळी, प्रोइन्कम्बन्सी दिसली, मागच्यावर्षी एन्टीइन्कम्बन्सी होती. त्यामुळे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 160 जागा जिंकू असं वाटत होतं, आम्ही त्याहीपेक्षा मोठा विजय मिळाला, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये मिळालेल्या मोठ्या विजयानंतर दिलीय. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप एनडीए (भाजप) आघाडीला 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला असून भाजपने 102 पैकी तब्बल 90 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे, भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा जल्लोष सुरू आहे. मात्र, बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बिहारमध्ये भाजपने विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री तथा जदयूचे प्रमुख नितीशकुमार यांच्या नेतृत्वात लढल्या आहेत. मात्र, एनडीए आघाडीत समसमान जागा लढवणारा भाजपच बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. भाजपने 102 पैकी 90 जागांवर विजय मिळवला असून नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाला 84 जागांवर विजय मिळाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, आता बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. तसेच, बिहारच्या निवडणुका ह्या नितीश कुमार यांच्याच नेतृत्वात लढल्या गेल्याचंही त्यांनी सांगितलं.

बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार?

नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये निवडणुका झाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, आमच्या पक्षाचे प्रमुख आणि नितीशकुमार हे एकत्र बसून घेतील. मुख्यमंत्री पदासंदर्भातील बोलण्याचा अधिकार मला नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. वेळोवेळी अमित शाह यांनी अतिशय स्पष्टपणे त्यासंदर्भात भूमिका मांडली आहे. आमच्या संसदीय समितीचा आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा तो निर्णय होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना मिळाली संधी

दरम्यान, महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या होत्या. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाला महाराष्ट्रात 57 जागा जिंकता आल्या, तर भाजपने 132 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे, अर्थातच भाजपच महाराष्ट्रातही मोठा भाऊ ठरला. त्यानंतर, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री बनले, तर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. त्यामुळे, आता बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाईल की नितीश कुमार यांना संधी मिळेल हे पाहावे लागेल.

हेही वाचा

Video: राहुल गांधींनी डान्स केला, नदीत उड्या टाकून बघितल्या पण..; बिहार विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा

Comments are closed.