अधिवेशन बोलवा, निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणा, नाना पटोलेंची मागणी
नाना पटोले: आज राज्यभरात होत असलेल्या राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत (Nagarparishad Election Result) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. आज मतदान झालं तरी त्याचे निकाल 21 तारखेला जाहीर केले जाणार आहेत. याबाबत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात निवडणूक आयोगाची अशी प्रक्रिया पहिल्यांदाच पाहतो आहे. जर मुख्यमंत्रीच असे म्हणत असतील, तर राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे निवडणूक आयुक्तांवर महाअभियोग आणला पाहिजे असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले. आम्ही तुमच्या सोबत आहोत, असेही पटोले म्हणाले.
निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणलाच पाहिजे
आम्ही पण निवडणूक आयोगाची प्रक्रिया पहिल्यांदाच पाहत आहोत.मात्र, असे असतानाही सरकार महाभियोग आणणार नसेल तर निवडणूक आयोगाच्या मागे तुम्हीच आहात असे म्हणायला वाव असल्याचे पटोले म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो घोळ दिसून येत आहे आणि मतदारांमध्ये मनस्ताप निर्माण करण्याचा काम जो निवडणूक आयोगाने केला आहे अशा निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणलाच पाहिजे असे पटोले म्हणाले. निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे पटोलेम्हणाले.
महाभियोग महाभियोग आणावा, आमचा त्यांना पाठिंबा
निवडणूक आयोग लोकशाहीचा दिवसाढवळा गळा घोटत आहे, लोकशाहीचा खून केला जात आहे. त्यामुळं जनतेमध्ये चिड निर्माण झाली आहे, म्हणून सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्याचे प्रस्ताव ठेवत आहोत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असल्याने आता त्यांनी महाभियोग आणावा, आमचा त्यांना पाठिंबा असल्याचे पटोले म्हणाले. जनतेमध्ये प्रचंड चिड आहे आणि अशा स्थितीत निवडणूक आयोगाला हाताशी धरून सरकारच असे घडवून आणत आहे का असाही संशय अनेकांना निर्माण झाला आहे.
सत्तेचा माज या निवडणुकीमध्ये दिसून आला
सत्तेचा माज या निवडणुकीमध्ये दिसून आला आहे आणि अनेक ठिकाणी यांचे पैसे पकडले गेले आहे. निलेश राणे यांनी भाजपचे पैसे पकडून दिले, भाजपने शिवसेनेचे पैसे पकडून दिले आहेत. बुथवर मतदानाच्या वेळेला पैसे वाटण्याचे काम झाले आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या पद्धतीचा कृत्य कधीच होत नव्हता. मात्र खुलेआम मतदान विकत घेण्याचे चित्र यंदा पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्राची माती करण्याचा काम यांनी केल्याचे पटोले म्हणाले. उमेदवारांना जो वाढीव खर्च येतो आहे त्याची जबाबदारी कोण घेणार आहे. माझी शंका आहे की सरकारच निवडणूक आयोगाला अशा गोष्टींसाठी घोळ निर्माण करण्यासाठी पाठिंबा देत आहे असे पटोले म्हणाले.
आरक्षणाचा गोंधळ निर्माण करून महाराष्ट्राचा वस्त्रहरण केलं
देवेंद्र फडणवीस 24 तासात ओबीसी आरक्षण आणून देण्याचे दावे करत होते. मात्र अजूनपर्यंत त्याबद्दल काहीही झालेलं नाही. घाई गडबडीत निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा योग्य सूत्र तयार करण्यात आलं नाही. त्यामुळे काही ठिकाणी ओबीसींचा आरक्षण 50 टक्केच्या पुढे गेलं. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने आरक्षणाचा गोंधळ निर्माण करून महाराष्ट्राचा वस्त्रहरण केलं गेलं आहे हे कोणीही नाकारू शकत नाही असे नाना पटोले म्हणाले.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ता पक्षाचे आमदार ज्या पद्धतीने गुंडगिरी करत आहेत, त्यामुळं संतोष देशमुखांसारखे अनेक प्रकरण महाराष्ट्रात झाली आहेत. गुन्हेगाराला शक्ती देणं हे सरकारचं धोरण आहे असे पटोले म्हणाले. उद्या निकाल अपेक्षित असताना मतमोजणी पुढे ढकलली, त्यामुळं सर्व काही संशयाच्या भोवऱ्यात आलं आहे. उद्या जर निकाल आले असते तर महाराष्ट्रात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष झाला असता. सरकार त्यांच्या ताब्यात असताना आता सर्वकाही चिंतेचा विषय झाला आहे असे पटोले म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.