Ajit Pawar’s one-sentence response after Sharad Pawar put an end to talks of both nationalist parties coming together


शरद पवार यांनी आज पुतण्याला म्हणजेच अजित पवार यांना सोबत न घेण्याच्या चर्चांवर अप्रत्यक्षपणे ठाम मत व्यक्त केले. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बैठका व कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पवार काका-पुतणे देखील एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होताना दिसत आहे. मात्र आज (17 जून) शरद पवार यांनी पुतण्याला म्हणजेच अजित पवार यांना सोबत न घेण्याच्या चर्चांवर अप्रत्यक्षपणे ठाम मत व्यक्त केले. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar’s one-sentence response after Sharad Pawar put an end to talks of both nationalist parties coming together)

काही दिवसांपूर्वीच अजित पवारांना विचारण्यात आले होते की, भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का? यावर ते म्हणाले होते की, माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सगळे (शरद पवार कुटुंब) आले होते. घरातील कार्यक्रम असतील तर कुटुंब म्हणून आम्ही सर्व एकत्र येत असतो. आमची विचारधारा वेगवेगळी आहे, पण बाकीच्या बाबतीत कुटुंब म्हणून सुख-दु:खात आम्ही एकत्र असतोच, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती. मात्र आता शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिल्यावर याबाबतीत जेव्हा अजित पवारांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे.

हेही वाचा – SS UBT Vs BJP : बोले तो भिडू, यही भाजपा का हिंदुराष्ट्र है…; बडगुजर प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा टोला

काय म्हणाले शरद पवार?

पिंपरी चिंचवडमध्ये आज (17 जून) शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अनेक लोक वेगळ्या विचाराचे आहेत. कोणीतरी आता म्हणाले सर्वांना बरोबर घ्या. सर्वांना बरोबर घ्यायला हरकत नाही. पण सर्व म्हणजे कोण? गांधी, नेहरू यांचा विचार आणि फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार मानत असेल तर त्यांना सोबत घेणे मान्य आहे. पण सत्तेसाठी भाजपासोबत जाऊन बसायचे ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवा, पण भाजपाशी संबंध हा काँग्रेसचा विचार असूच शकत नाही. संधी साधूपणाचे राजकारण आम्हाला प्रोत्साहीत करायचे नाही. त्यादृष्टीने पाऊलही टाकायची नाही. आम्ही संधीसाधूंसोबत जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली.

हेही वाचा – Sanjay Raut : अडचण असणाऱ्यांना पक्षानेच केले दूर, बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशावर राऊतांचा टोला



Source link

Comments are closed.