किरकोळ कारणावरून दोन दिवस डांबून ठेवत जबर मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, दोघांना अटक

अंबाजोगाई गुन्हेगारीची बातमीः अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावात किरकोळ कारणावरून एका तरुणाला दोन दिवस डांबून ठेवत बांबूच्या काठ्यांनी, लाकडी दांडक्यासह लाथाबुक्यांनी बेदम मारहाण (Crime News) केली होती. या मारहाणीत त्याला मार लागून पोटात गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय.अविनाश सगट असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.मयत तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत.

घागऱ्यावरून वाद; दुकानदाराला धमकावत केली तीन लाखांची खंडणीची मागणी

कल्याण, पश्चिम शहरातील प्रसिद्ध कलाक्षेत्र या दुकानात घागऱ्याच्या व्यवहारावरून सुरू झालेला सौम्य वाद काही तासांतच धक्कादायक वळणावर पोहोचला. लग्नासाठी खरेदी केलेल्या तीस हजार रुपये किमतीच्या घागऱ्यावरून एक वाद उफाळून आला. यात धारदार चाकूने तरुणाने दुकानात येऊन घागरा फाडला आणि दुकानदाराकडे तब्बल तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढीलत पास सुरू केला आहे.

धारदार चाकू काढून घागरा फाडून टाकला

पुढे आलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिममधील ‘कलाक्षेत्र’ या दुकानातून मेघना माखिजा या तरुणीने लग्नासाठी तीन हजार रुपयांचा घागरा खरेदी केला. परंतु घरी गेल्यावर तो घागरा तिला पसंत पडला नाही. यानंतर ती परत दुकानात आली आणि घागरा दुकानदाराला परत केला. त्या वेळी दुकानदाराने स्पष्ट सांगितले की, “तीन महिन्यांच्या आत तुम्ही आमच्या दुकानातून त्या रकमेइतक्या वस्तू खरेदी करू शकता, अशी चर्चा दोघांमध्ये शांतपणे पार पडली. मात्र काही वेळानंतर, तरुणीचा होणारा पती  सुमित सयानी दोन तासांनी दुकानात पोहोचला. त्याने घागऱ्याबाबत दुकानदारासोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि खिशातून धारदार चाकू काढून घागरा फाडून टाकला.

जर पैसे दिले नाहीत, तर…..

त्यानंतर सुमितने दुकानदाराकडे थेट 3 लाख रुपयांची मागणी केली आणि धमकी दिली की, “जर पैसे दिले नाहीत, तर तुझ्या दुकानाची बदनामी सोशल मीडियावर करीन, असं सांगून तिथून निघून गेला. घटनेनंतर घाबरलेल्या दुकानदाराने तात्काळ कल्याण पश्चिम बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बाजारपेठ पोलीस घटनेचा तपास करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.