Anil Deshmukh reveals how Sanjay Raut’s editorial written in jail was published in the paper


तुरुंगात लिहिलेल्या “नरकातला स्वर्ग” हे संजय राऊत यांचे पुस्तक जेव्हा प्रकाशित झाले होते, तेव्हा मोठा वादंग झाला होता. या पुस्तकात संजय राऊत यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत तुरुंगात घालवलेल्या दिवसांचाही उल्लेख केला आहे. दरम्यान, आता अनिल देशमुख यांनी संजय राऊत यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे 2022 मध्ये तुरुंगात होते. त्यावेळी संजय राऊत यांना नियमित वाचन आणि लेखन करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र संजय राऊत यांनी केलेलं लिखाण तुरुंगाबाहेर येणार नाही, याची दक्षता घेण्यात येत होती. तरीही सामना पेपरमध्ये अग्रलेख छापून यायचे, असा दावा संजय राऊत यांनी स्वत: केला होता. तसेच तुरुंगात लिहिलेल्या “नरकातला स्वर्ग” हे संजय राऊत यांचे पुस्तक जेव्हा प्रकाशित झाले होते, तेव्हा मोठा वादंग झाला होता. या पुस्तकात संजय राऊत यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत तुरुंगात घालवलेल्या दिवसांचाही उल्लेख केला आहे. दरम्यान, आता अनिल देशमुख यांनी संजय राऊत यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. (Anil Deshmukh reveals how Sanjay Raut’s editorial written in jail was published in the paper)

तुरुंगातील दिवसांची आठवण काढताना अनिल देशमुख म्हणाले की, ईडी आणि सीबीआयचा वापर करून अनेक नेत्यांसह पक्षांना फोडण्यात आलं आहे. देशात अनेक मोठ्या नेत्यांना समन्स पाठवण्यात आली. खास करून सोनिया गांधी ते शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे या नेत्यांच्या जवळच्या लोकांना समन्स पाठवण्यात आली. कारण सध्या बदला घेण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळेच संजय राऊत यांना खोट्या केसेसमधे फसवून तुरुंगात टाकण्यात आलं होतं. जेव्हा मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो. तेव्हा उद्योगपती मुकेश अंबानी प्रकरण समोर आलं होतं. सचिन वाझे आणि पोलीस आयुक्त यांनी प्लॅनिंग केलं होतं. माझ्या आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर जेव्हा बातमी आली, तेव्हा तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह आणि सचिन वाझेलाही निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी रागाने माझ्यावर आरोप केले, असा दावा अनिल देशमुख यांनी केला.

हेही वाचा – Sharad Pawar : हिंदी भाषेला साईडचं समजण्याचं कारण नाही; पवारांनी ठाकरे बंधुंच्या भूमिकेवरही मांडले मत

छापेमारीबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, ईडी आणि सीबीआय अशा यंत्रणांनी माझ्या घरासह इतर 170 ठिकाणी धाड टाकली होती. माझी 6 वर्षांची नात आहे. अधिकाऱ्यांनी तिला कॅडबरी चॉकलेट देऊन तिचीही 20 मिनिटे चौकशी केली होती. माझ्या पत्नीला देखील या चौकशीचा मोठा त्रास झाला. कारण माझ्या पत्नीला कर्करोगाचा त्रास आहे. त्यावेळी जर मी जुळवून घेतलं असतं तर चित्र वेगळं असतं. पण मी जुळवून घेतलं नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

अनिल देशमुख म्हणाले की, मी आणि संजय राऊत एकाच तुरुंगात होतो. त्यामुळे माझी आणि संजय राऊत यांची भेट व्हायची. संजय राऊत यांना घरचा डबा होता. मात्र मला घरच्या डब्याची परवानगी देण्यात आली नव्हती. मी न्यायाधीशांचं नाव सांगत नाही, पण त्यांनी मला सांगितलं होत की, महात्मा गांधी तुरुंगातला डबा खात होते. मग अनिल देशमुख यांना घरचा डबा का? अशी माहिती देत अनिल देशमुख म्हणाले की, संजय राऊत यांना जेव्हा जेव्हा मी भेटायला जायचो, तेव्हा ते काहीतरी लिहत बसलेले असायचे. मी त्यांना विचारायचो काय लिहताय, तर ते मला म्हणायचे उद्याचा सामना वाचा. कारण आतमध्ये त्यांनी व्यवस्थित यंत्रणा लावली होती, असा गोप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला. त्यांनी असेही म्हटले की, संजय राऊत यांच्या आग्रहावरून मी पुस्तक लिहायला घेतलं आहे. संजय राऊत यांच्या आग्रहाखातर मी आता लेखक झालो आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

हेही वाचा – Uddhav Thackeray : भाजपाच्या भाषिक आणीबाणीला विरोधच, उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका



Source link

Comments are closed.