Commenting on the Emergency Sanjay Raut said that Shankarrao Chavan’s son Ashok Chavan is joining the BJP today


देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीला बुधवारी (25 जून) 50 वर्षे पूर्ण झाली. याचपार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणीबाणीवर भाष्य करताना भाजपावर टीका केली आहे.

मुंबई : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर केली आणि एकच हाहाकार माजला होता. या आणीबाणीचा आजही विषय काढला तरी सत्ताधारी भाजपाकडून काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेतेमंडळींवर निशाणा साधण्यात येतो. देशावर लादण्यात आलेल्या या आणीबाणीला बुधवारी (25 जून) 50 वर्षे पूर्ण झाली. याचपार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणीबाणीवर भाष्य करताना भाजपावर टीका केली आहे. (Commenting on the Emergency Sanjay Raut said that Shankarrao Chavan’s son Ashok Chavan is joining the BJP today)

मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाचे लोक सांगतायत की, आणीबाणी हा काळा अध्याय आहे. पण, मला वाटतं की, अनेक काळे अध्याय आहेत. मोठा काळा अध्याय म्हणजे महात्मा गांधी यांची हत्या झाली. दुसरा काळा अध्याय कोणता तर प्रेसिडंट ट्रम्पच्या दबावाखाली देशाचा पंतप्रधान सरेंडर झाला, यापेक्षा मोठा काळा अध्याय कोणता असेल? हे काय आम्हाला आणीबाणी सांगतायत. देशाच्या सध्याच्या पंतप्रधानांनी कितीही प्रयत्न केले तरी इथली लोकशाही मरणार नाही. कारण इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली, तेव्हा ती देशाची गरज होती असं मी मानतो. त्यावेळच्या परिस्थीतिनुसार आणीबाणी जाहीर केली होती. संविधानाणे दिलेले अधिकार वापरून आणीबाणी जाहीर केली होती आणि तो त्यांचा अधिकार होता. पण, गेल्या 11 वर्षात अघोषित आणीबाणी सुरू आहे त्याच काय? असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती टीका केली.

हेही वाचा – Sanjay Raut : राऊतांनी तुरुंगात लिहिलेला अग्रलेख कसा छापून यायचा; महाविकास आघाडीच्या नेत्याचा गौप्यस्फोट

संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांवर साधला निशाणा

संजय राऊत म्हणाले की, पहलगाम हल्ला आणि पाकिस्तानविरुद्धच्या लढाईसंदर्भाने आम्ही मागणी करतोय की, विशेष अधिवेशन बोलवा, पण ते बोलवत नाहीत. आम्हाला विचारायच आहे की, पंतप्रधान मोदी आपण सरेंडर का झालात? कारण आणीबाणीवेळी अनेक पत्रकारांवर कारवाई झाली. काही लोकांची वर्तमानपत्र बंद झाली, त्यात आमचं मार्मिक होतं. तेव्हा वर्तमानपत्रे बंद पाडणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचा मुलगा आता भाजपाला जवळचा झाला आहे. अशोक चव्हाण आता मोदींना प्रिय झाले आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली.

हेही वाचा – Sharad Pawar : हिंदी भाषेला साईडचं समजण्याचं कारण नाही; पवारांनी ठाकरे बंधुंच्या भूमिकेवरही मांडले मत



Source link

Comments are closed.