पाच शतकं, 835 धावा अन् तरीही हरली टीम इंडिया, लीड्स कसोटीत गंभीरची रणनीती फसली? पराभवानंतर म्हण

गौतम गंभीर पत्रकार परिषद: शुभमन गिलच्या इंग्लंडविरुद्धच्या कर्णधारपदाच्या सुरुवात हेडिंग्ले येथील लीड्स कसोटीतील पराभवाने झाली. या सामन्यात भारताने अनेक विक्रम मोडले आणि ऐतिहासिक कामगिरी केली. शेवटी, भारतीय संघ 5 विकेट्सने पराभूत झाला आणि इंग्लिश संघाने हा सामना जिंकला. टीम इंडियाच्या फलंदाजांनी दोन्ही डावात 835 धावा केल्या.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारतीय फलंदाजांनी एकाच सामन्यात पाच शतके झळकावली. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी शानदार डाव खेळले आणि भारतासाठी शानदार शतके झळकावली. त्याच वेळी, ऋषभ पंतनेही दोनदा शतक झळकावून इतिहास रचला. तरीही, भारतीय संघ विजयाची चव चाखू शकला नाही. सामना संपल्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी एक मोठे विधान केले आहे.

गौतम गंभीरने भारतीय संघाच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “सर्वात आधी, मी हे स्पष्ट करू इच्छितो की आम्ही प्रयत्न केले नाहीत, असं अजिबात नाही.  कॅच सुटतात आणि जगातील सर्वोत्तम खेळाडू देखील कॅच सोडतात. असे नाही की कोणी जाणूनबुजून कॅच सोडतो.

खरं तर, भारताच्या 8 ते 11 क्रमांकाच्या फलंदाजांनी दोन्ही डावांमध्ये मिळून फक्त 9 धावा केल्या होत्या. यावर गंभीर म्हणाला की, “कधी कधी खेळाडू अपयशी ठरतात, आणि ते पूर्णपणे स्वीकारण्यासारखं आहे. मला माहित आहे की हे निराशाजनक आहे, पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे ते स्वतःवरच सर्वाधिक निराश आहेत. कारण त्यांना माहित होतं की आपल्या हातात मोठी संधी होती. जर आपण पहिल्या डावात 570-580 धावा केल्या असत्या, तर आपण त्या ठिकाणी सामन्यावर पकड मिळवू शकलो असतो.”

गौतम गंभीरने कोणत्याही खेळाडूवर बोट ठेवण्याचे किंवा एखाद्या स्टार खेळाडूच्या खराब कामगिरीवर थेट टीका करण्याचे टाळले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “संघ एकत्र जिंकतो आणि एकत्र हरतो.”

गंभीर म्हणाला की, असं नाही की खेळाडू नेटमध्ये मेहनत करत नाहीत. कधी कधी असं होतं की चांगले फलंदाजही अपयशी ठरतात. त्यामुळे आशा आहे की त्यांनी यातून शिकले असेल आणि आपले खालच्या फळीतील फलंदाज पुढच्या वेळेस अधिक चांगली कामगिरी करतील.

प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर टेस्ट सामना हरायचं हे एकच कारण नव्हतं. अशा अनेक क्षणांना आपण सामना जिंकू शकलो असतो. मी इथे बसून असं म्हणणार नाही की ‘हे फक्त खालच्या फळीमुळे झालं’ किंवा ‘8, 9, 10, 11 यांचा काहीही वाटा नव्हता’. आपण एकत्र हरतो आणि एकत्र जिंकतो.”

आणखी वाचा

Comments are closed.