‘…त्यावर बोलण्यात अर्थ नाही’, उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्री
Nagarparishad Election Result: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. काही नगरपरिषदांची न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे राज्यातील सुमारे 20 नगरपरिषदांचे मतदान पुढे ढकलण्यात आले होते आणि त्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार होत्या. यामुळे सर्व निकाल एकाच दिवशी घोषित न झाल्यास पुढे होणाऱ्या 20 नगरपरिषदांच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो, असा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. या पार्श्वभूमीवर खंडपीठाने सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी, म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. आजचे मतदान झाले तरी त्याची मतमोजणी व निकाल 21 तारखेलाच जाहीर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच 20 डिसेंबरला मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोल प्रसिद्ध करता येतील आणि आदर्श आचारसंहिताही त्याच तारखेपर्यंत लागू राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Hasan Mushrif: हा उमेदवारांवर अन्याय आहे…
माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, काही नगरपालिकेच्या निवडणुका २० तारखेला गेल्या आहेत. बाकीचा जो निकाल लागणार आहे, त्याचा परिणाम होईल, त्यामुळे अनेक नगरपालिका न्यायालयात गेल्या आहेत. याबाबत आधीच मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. उमेदवार कष्ट करतात, हा उमेदवारांवर अन्याय आहे, तन मन धन लावून उमेदवार काम करत असतात, दोन दिवस पुढे गेली असती तर वाईट वाटलं नसतं, पण हा अन्याय झाला आहे. पण आता उच्च न्यायालयाने याबाबत निकाल दिला आहे, त्यावर बोलण्यात अर्थ नाही. निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यांच्यावर बोलण्यात अर्थ नाही. या आधी देखील विधानसभा, लोकसभा निवडणुकीत 20 दिवस ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवले आहेत. प्रशासन त्याची योग्य ती खबरदारी घेईल. विधानसभेच्या मतदानानंतर आम्ही परदेशात गेलो होतो, आता हे उमेदवार देखील श्रमपरिहार करायला बाहेर जातील असंही पुढे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
High Court Nagpur : न्यायाधीश नेमकं काय म्हणाले?
ज्या अर्थी एक्झिट पोल (Exit Poll) अखेरचे फेजचे मतदान संपेपर्यंत जाहीर केले जात नाही, कारण मतदानाचे सर्व फेज फ्री अँड फेयर (Free and Fair Election) राहिले पाहिजे, त्या अर्थी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा (Nagarparishad Election Result) 2 डिसेंबरचा टप्पा पार पडल्यानंतर, 20 डिसेंबरचे मतदान व्हायचे असताना, 3 डिसेंबरला मतमोजणी करून निकाल कसे घोषित करू शकता? असा सवाल करत राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.
आपण याला एक निवडणूक म्हणून मानले पाहिजे. लोकसभेत 1 फेज झाल्यानंतर निकाल जाहीर करता की अखेरच्या फेजपर्यंत थांबता? मग इथे असे का? असा प्रश्नही न्यायालयाने केला आहे. उलट राज्य निवडणूक आयोगाने हे खुद्द करायला हवे होते.असेही निरीक्षण नागपूर खंडापीठाने नोंदवले आहे. परिणामी आता सर्व मतमोजणी 21डिसेंबरला घ्या. असा महत्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता एकत्रितरित्या मतमोजणी केली जाणार आहे.
Nagarparishad Election Result: उद्याची मतमोजणी रद्द, आता काय परिणाम होणार?
* प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे लागतील.
* ही निवडणूक जवळपास 280 ठिकाणांवर होत असल्याने आणि प्रत्येकाची मतमोजणी स्वतंत्र ठिकाणी वेगवेगळ्या शहरात असल्याने जवळपास 280 पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागेल.
* शिवाय सर्व स्ट्रॉंग रूममध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल.
* स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूममध्ये जाऊन पाहणी करणे आणि स्वाक्षरी करणे बंधनकारक असते. ती प्रक्रिया रोज 21 नोव्हेंबर पर्यंत पार पाडावी लागेल.
*विधानसभेला साधारणपणे 288 ठिकाणी मतमोजणी असते, जवळपास तेवढेच मतमोजणी ठिकाण नगर परिषद निवडणुकीत आहेत. मात्र, लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे विधानसभेची मतमोजणी वोटिंग नंतर लगेच एक किंवा दोन दिवसात होते.
* म्हणजे आज मतमोजणी समोर ढकलली गेली, तर विधानसभा निवडणूक सुमारे तीन आठवडे सांभाळावी एवढी प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा कामी लागेल.
Nagarparishad Election Result: नव्या निवडणूक कार्यक्रमाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांचा तर्क
1) आधी जे चिन्ह मिळाले होते, ते घेऊन प्रचार झाला आहे, त्यामुळे आता नव्या प्रक्रियेत नवे चिन्ह देऊ नये, चिन्ह बदलले जाऊ नये
2) निवडणुका रद्द होईपर्यंत बराच खर्च झालेला आहे, त्यामुळे त्या खर्चाचे काय??? खर्चाची मर्यादा वाढविली पाहिजे
3) 20 तारखेची polling होईपर्यंत कोणतेही Exit poll प्रसारित होऊ नये.
आणखी वाचा
Comments are closed.