धर्मशाळेत मॅच सुरू होती, पण पडद्यावर जे दिसलं, त्यामुळे सगळेच चक्रावले; भारताच्या नकाशाशी छेडछा
IPL क्वालिफायर 1 मध्ये भारताच्या चुकीच्या नकाशाचा वाद : आयपीएल 2026 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने गुजरात टायटन्सला तब्बल 92 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. धर्मशाळामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत 254 धावांचा डोंगर उभारला आणि आयपीएल प्लेऑफ इतिहासातील सर्वात मोठा स्कोर नोंदवला.
𝗠𝗶𝗱-𝗶𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗺𝗮𝗴𝗶𝗰 जसे आम्ही कधीच पाहिले नसेल
🎥 एक भावपूर्ण संगीतमय प्रदर्शन त्यानंतर धरमशाला मध्ये एक मनमोहक लेझर शो 🎶👏
अपडेट्स ▶️ https://t.co/9rs6u5obOw#TATAIPL | #क्वालिफायर १ | #The FinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/P5SUA4SUkm
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) २६ मे २०२६
मात्र सामन्यानंतर लेझर लाईट शोदरम्यान मोठा वाद पेटला. ब्रॉडकास्टमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचा आरोप होताच सोशल मीडियावर संतापाचा स्फोट झाला. अनेक चाहत्यांनी “हा शो देशाचा अपमान” असल्याची प्रतिक्रिया दिली, तर काहींनी थेट कारवाईची मागणी केली.
कृपया IPL क्वालिफायर 1 मध्ये भारताचा नकाशा विकृत करण्याचे कारण स्पष्ट करा? ही राष्ट्रविरोधी कृती नाही का?@IPL @BCCI @जयशाह कृपया याकडे लक्ष द्या आणि योग्य ती कारवाई करा @AmitShah @narendramodi @PMOIndia @राजनाथसिंह @राहुलगांधी @priyankagandhi @INCIndia @ravish_journo pic.twitter.com/iJIPxC6r7d
— कृष्णा (@Krishna10170681) २६ मे २०२६
वाद आणखी वाढला कारण ट्रॉफी दाखवताना देखील चुकीचा भारताचा नकाशा दिसल्याचा दावा करण्यात आला. यामुळे चाहते आता बीसीसीआय आणि आयपीएल व्यवस्थापनावर निशाणा साधत आहेत. विशेष म्हणजे, अद्याप बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माफी किंवा स्पष्टीकरण आलेले नाही. संबंधित व्हिडीओ अजूनही आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंटवर असल्याने चाहत्यांचा संताप अधिक वाढला आहे.
त्यांनी भारताचा नकाशा चुकीचा दाखवला, भारतातील बीसीसीआय आणि आयपीएल संचालक काय करत आहेत? हे आयोजन करणाऱ्या संपूर्ण टीमने, हे जाणूनबुजून केले किंवा चुकून केले याची मला पर्वा नाही, परंतु ज्याने तो लाईट शो चालवला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, लाजिरवाणी आहे. pic.twitter.com/jp1aGuPRZd
— वेदिता चौहान (@VeedhitaChouhan) २६ मे २०२६
दरम्यान मैदानावर मात्र आरसीबीने अक्षरशः कहर केला. 255 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची टीम फक्त 162 धावांत गारद झाली. गोलंदाजीत जेकब डफीने 3 विकेट घेत गुजरातचा कणा मोडला, तर भुवनेश्वर कुमार, राशिख सलाम आणि क्रुणाल पंड्याने प्रत्येकी 2 विकेट घेत सामना एकतर्फी केला. आता 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात आरसीबीसमोर गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद किंवा राजस्थान रॉयल्स यापैकी एक संघ असणार आहे.
कृपया IPL क्वालिफायर 1 मध्ये भारताचा नकाशा विकृत करण्याचे कारण स्पष्ट करा? ही राष्ट्रविरोधी कृती नाही का?@IPL @BCCI @जयशाह कृपया याकडे लक्ष द्या आणि योग्य ती कारवाई करा @AmitShah @narendramodi @PMOIndia @राजनाथसिंह @राहुलगांधी @priyankagandhi @INCIndia @ravish_journo pic.twitter.com/iJIPxC6r7d
— कृष्णा (@Krishna10170681) २६ मे २०२६
कृपया IPL क्वालिफायर 1 मध्ये भारताचा नकाशा विकृत करण्याचे कारण स्पष्ट करा? ही राष्ट्रविरोधी कृती नाही का?@IPL @BCCI @जयशाह कृपया याकडे लक्ष द्या आणि योग्य ती कारवाई करा @AmitShah @narendramodi @PMOIndia @राजनाथसिंह @राहुलगांधी @priyankagandhi @INCIndia @ravish_journo pic.twitter.com/iJIPxC6r7d
— कृष्णा (@Krishna10170681) २६ मे २०२६
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.