RCB संघावर एका वर्षासाठी बंदी लागू करण्याची शक्यता, BCCIकडून लवकरच मोठा निर्णय अपेक्षित!

आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेत तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीने ट्रॉफी वर त्यांच्या संघाचे नाव कोरले. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव करून आरसीबीने (RCB) 2025 स्पर्धेची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर बंगळुरूमध्ये विजय साजरा करण्यात आला यादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर भव्य कार्यक्रम मिरवणूक आयोजित करण्यात आली होती आणि या विजयासाठी अनेक चाहत्यांनी खूप मोठी गर्दी केली आणि या गर्दीतच 11 जणांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर आरसीबी विरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या दोन अधिकाऱ्यांनी आतापर्यंत राजीनामा देखील जाहीर केलेला आहे. तसेच या प्रकरणात एका व्यक्तीला अटक देखील झालेली आहे.

11 जणांच्या मृत्यूमुळे आरसीबी संघ अडचणीत सापडला आहे. 2026 च्या हंगामामध्ये आरसीबी स्पर्धेत सहभागी होऊ शकेल की नाही? यावर बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

त्या कार्यक्रमात एवढी मोठी चूक कशी काय झाली, यावर चौकशी सुरू आहे. या चुकीमध्ये आरसीबी व्यवस्थापनाचा कुठेही संबंध आला तर बीसीसीआय मोठी भूमिका घेत आरसीबी संघावर कठोर कारवाई करू शकते. आयपीएलमध्ये अनेक फ्रेंचाइजी जरी बिझनेस करत असले तरी बीसीसीआयच्या नियमानुसार त्यांना हे देखील मान्य करावेच लागेल, ज्यामध्ये सार्वजनिक लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील संबंधित आहे.

Comments are closed.