राज ठाकरेंपुढे उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे; रामदास कदम यांचा हल्लाबोल, मुंबईतील सावली बार

उधव ठाकरे वर रामदास कडम: ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शीत झाला. उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवरुन शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनी मुलाखत घेणं म्हणजे उंदराला मांजर साक्ष, असं आहे. उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलंय, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. दिल्लीत हॉटेल लीलामध्ये काय काय झालं, हे उद्धव ठाकरेंना विचारा. मला सगळं माहितीय, मी सांगेन, असंही रामदास कदम म्हणाले.

उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला धोंडा म्हणत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नको नको ते म्हणायचं आणि पुन्हा पंतप्रधानांच्या पाया पडत मला वाचवा, माझ्या मुलाला दिशा सालियन प्रकरणातून वाचवा, असं म्हणायचं, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केला.

मांजर डोळे मिटून दूध पिते ते सगळ्यांना दिसतं- रामदास कदम

आम्हाला भाजपमध्ये घ्या…आमची तयारी आहे. एकनाथ शिंदेंचं राजकारण संपवा, म्हणजे मी भाजपमध्ये येतो, अशा अटी आणि शर्ती टाकण्याचं काम उद्धव ठाकरेंकडून सुरु आहे, असा दावाही रामदास कदम यांनी केला. मांजर डोळे मिटून दूध पिते ते सगळ्यांना दिसतं, असा टोलाही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत- रामदास कदम

राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत. राज ठाकरे काहीही बोलत नाही. मुंबईत 12 टक्के मराठी माणूस शिल्लक आहे. महापालिका कशी गळ्यात घालता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत, असा निशाणा रामदास कदम यांनी साधला. तसेच मुंबईतील सावली बार प्रकरणावर रामदास कदम यांनी भाष्य केलं. ठाकरे गटाचे अनिल परब यांनी खोटी माहिती दिली. रामदास कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी डान्सबार कधीही चालवले नाही. आम्ही लोकांचे संसार उद्धवस्त केले नाही, तर आम्ही लोकांचे संसार वाचवले. आमचं डान्सबार असल्याचं सांगत अनिल परब विधानसभेत खोटी माहिती देतायत. मी त्यांचा निषेध करतो, असंही रामदास कदम यांनी सांगितले.

अनिल परब यांचा नेमका आरोप काय?

विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब यांनी विधानसभेत हा आरोप केला. अनिल परब म्हणाले की, कांदिवली येथे सावली बार आहे. इथे पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. 22 बारबाला 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला. या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृहमंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असे अनिल परब यांनी म्हटले. एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? आजच्या आज गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही अनिल परब यांनी केली होती.

https://www.youtube.com/watch?v=Ch6mtutbzkk

संबंधित बातमी:

Savali Bar Mumbai: कदमांच्या ‘सावली बार’वर कारवाई, धाड टाकताच काही बारबाला अश्लील…; FIR मध्ये नेमकं काय काय?

आणखी वाचा

Comments are closed.