बेवफा सोनम रघुवंशी हनिमून प्रकरणात 3 नवीन नावांमुळं ट्विस्ट, नक्की किती जणांना बळीचा बकरा बनवलं

सोनम रघुवन्शी: राजा रघुवंशी हत्याकांडाची देशभर चर्चा असताना या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह या दोघांनी कुणाचा कट केल्याचं पोलिस तपासात समोराला आहे. सोनमने तिच्या पतीला सुपारी देऊन मारले. अटक केलेल्या आरोपींमध्ये तिचा प्रियकर राज कुशवाह याचा सहभाग असल्याचे पोलिसांचे दावे आणखी बळकट झाले आहेत. दरम्यान आता या प्रकरणात मेघालय पोलिसांचा तपास सुरू असून इयत्ता प्रसाद आता तीन नवीन नावांमुळे एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. साेनमनं या हत्येसाठी नक्की किती जणांना बळीचा बकरा केलंय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पोलिसांनी आता सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी प्रकरणात इंदौर येथून तीन आरोपींना अटक केली आहे. या तिघांवर पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. पैशांचा लोभासाठी या तिघांनी राजा रघुवंशी च्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यात सहभागी झाल्याचा समोर येत आहे. लोकेन्द्र सिंह तोमर, आणि बल्लू अहिरवार अशी या तीन आरोपींची नावे आहेत .

फ्लॅटमधून तिन्ही आरोपी बॅगा घेऊन निघाले

मुख्यरूपी विशाल चव्हाण ला अटक केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले .त्याच्या माहितीवरून पोलिसांना इंदौरच्या देवास नाका येथे फ्लॅट सापडला .याच फ्लॅटमध्ये राजा रघुवंशीची पत्नी सोनम काही दिवसांपासून लपून बसल्याचं सांगितलं जातं .सोहरा येथून परतताना सोनम ने एक बॅग आणली होती .जात रोख रक्कम दागिने आणि मोबाईल फोन होता .पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत हा फ्लॅट पूर्णपणे रिकामा होता .यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या फ्लॅटमधून सिलोन लोकेंद्र आणि बल्लू हे तिघे संशयास्पद बॉक्स घेऊन जाताना दिसले .या सीसीटीव्ही फुटेज नंतर पोलिसांचा संशय अधिक वाढला .सिलोन दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना इंदौर मध्ये एक जळालेली बॅग सापडली .ही बॅग आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे .या बॅगेत असे काही पुरावे असतील ज्यामुळे हत्येचा कट उघड होऊ शकतो असा पोलिसांचा दावा आहे .

अनेक पुरावे सापडण्याची शक्यता

पोलीस अधीक्षक विवेक सैम म्हणाले, पुरावे नष्ट केल्यानंतर हे तीनही आरोपी वेगवेगळ्या दिशेने पळून गेले .एक जण हरिद्वारकडे काही भोपाळकडे आणि काही अशोक नगरकडे . या संपूर्ण घटनेत अनेक पुरावे सापडण्याची शक्यता असून सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरणात हत्येच्या कटामागे नक्की किती जण होते हे समोर येण्याची शक्यता आहे . सोनम रघुवंशी च्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की तिचं लग्न राजा रघुवंशी तिच्या संमतीने झाले .जर सोनमला राजा आवडत नव्हता तर तिने त्याच्याशी लग्न का केले ?आतापर्यंत पोलिसांना राजा रघुवंशी च्या हत्ती मागचा हेतू उघड करण्यात ठोस पुरावे सापडत नसल्याचं समोर येत आहे .सोनम आणि राज कुशवाह या दोघांचे प्रेम संबंध सोबत व्यवसाय करण्यासाठी असणारे हितसंबंध हे राजाच्या हत्त्येचे कारण असल्याचे सध्यातरी पोलिसांचे म्हणणे आहे .राजा रघुवंशी च्या हत्येमागचा हेतू  हा वैयक्तिक आणि आर्थिक लोभाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे .

https://www.youtube.com/watch?v=OS0YJNRKVMK

आणखी वाचा

Comments are closed.