मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा, फोटो पाहा… एका क्लिकवर
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज गुरुवारी (17 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत मुख्य शासकीय सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण, मानवंदना, शहीदस्मारकास अभिवादन करण्यात आले. मोठ्या उत्साहात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरू आहे. आताही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करू, असा शब्द मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज गुरुवारी (17 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत मुख्य शासकीय सोहळ्यास उपस्थित होते.
यावेळी पोलिसांकडून बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
शहीद स्मारकास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण, मानवंदना, शहीदस्मारकास अभिवादन करण्यात आले.
उपस्थित सर्व मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित या सोहळ्यास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजूरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, खासदार संदिपान भुमरे, खासदार कल्याण काळे, विधानपरिषद आमदार सतिष चव्हाण, आमदार अंबादास दानवे व अन्य नेतेमंडळी उपस्थित होती.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवराय, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित केली. तसेच, कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करू, असा शब्द मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला.
Comments are closed.