2026 च्या बोर्ड परीक्षेपासून 10वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, असा अभिनव उपक्रम महाराष्ट्रातील 'या' महानगरपालिकेने सुरू केला आहे.

महाराष्ट्र 10वी बोर्ड : महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकतेच 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी जोमाने अभ्यास करत आहेत. अशाप्रकारे आता 2026 मध्ये 10वी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

आता राज्यातील काही 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत मिळणार असून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाची सुरुवात नागपूर शहरात करण्यात आली आहे. महापालिका शाळांमधून दहावी उत्तीर्ण झालेल्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांना नागपूर महापालिका ५० हजार रुपयांचे बक्षीस देणार आहे.

या संदर्भात गुणवंत विद्यार्थ्यांना ५० हजार रुपयांची रक्कम दोन टप्प्यात दिली जाणार आहे. म्हणजेच पात्र विद्यार्थ्यांना हे पैसे दोन हप्त्यांमध्ये दिले जातील. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस तर मिळेलच शिवाय पुढील शिक्षणासाठी हा निधी वापरता येईल.

नागपूर महानगरपालिकेच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे दहावी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबलही वाढेल. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचा फायदा पुढील वर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही होणार आहे.

त्यामुळे जर तुम्हीही नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत शाळांमध्ये शिकत असाल आणि तुम्ही 10वीत असाल तर तुम्ही नक्कीच चांगला अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला 10वीमध्ये चांगले गुण मिळू शकतील आणि महानगरपालिकेने सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमांतर्गत तुम्हालाही 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळेल.

दहावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी महापालिकेच्या या प्रस्तावाला महापालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी नुकतीच मान्यता दिली असून या निर्णयाचे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही स्वागत केले आहे.

नागपूर महापालिकेच्या शाळांमधून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले होते. गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करताना महापालिका आयुक्तांनी हे आश्वासन दिले होते आणि आता हे आश्वासन पूर्ण केले आहे.

नागपूर महानगरपालिकेने नुकतीच ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे याअंतर्गत दरवर्षी ५० विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

Comments are closed.