Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray during Congress leader party induction in Solapur
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक नेतेमंडळी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गचाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा भव्य असा प्रवेश सोहळा पार पडल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी (ता. 5 जून) काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचा अक्कलकोट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी मोठ्या संख्येने शिंदे गटाचे पदाधिकारी, नेतेमंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हा कार्यक्रम जरी काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या प्रवेशाचा असला तरी शिंदेंनी ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र डागल्याचे पाहायला मिळाले. (मराठी criticizes Uddhav Thackeray during Congress leader party induction in Solapur)
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्कलकोट येथे जाहीर सभा घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. म्हेत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडिल सातलिंग्गपा म्हेत्रे इथले मोठे प्रस्थ होते. म्हेत्रे परिवाराने कधी जात धर्म पक्ष पाहिला नाही, आलेल्या माणसाचे काम केले. त्यामुळे इथल्या हिंदु मुस्लिम बांधवांचा म्हेत्रे परिवाराला कायम पाठिंबा राहिला आहे. श्रीमंत घराण्यात जन्माला येऊन देखील सिध्दारामजी यांच्यात कधीही अहंकार आला नाही. अनेक लोक वडिलांच्या नावावर फुशारक्या मारतात, मात्र सिध्दारामजी यांनी कधीही बढाया मारल्या नाहीत, ते कायम जमीनीवर राहिले. कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे, असे म्हणत शिंदेंनी ठाकरे गटाला अप्रत्यक्ष टोला लगावला.
हेही वाचा… Thackeray Vs BJP : मोदींच्या काळात भारताची पत घसरणीला लागली, उद्धव ठाकरेंचा थेट आरोप
तसेच, आज सिध्दाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. जिथे दिशा नाही तिथे दशा झाली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसवर केली. सिध्दाराम म्हेत्रे अनुभवी आहेत. त्यांच्या नावात राम आहे. ते शिवसेनेत आल्याने आता सोलापूर, अक्कलकोट, दुधनीचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. तर, तीन वर्षांपूर्वी जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड झाली, तेव्हा आम्ही सत्ता सोडली आणि राज्याने एक मोठा उठाव पाहिला. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ते पाऊल उचलले. केवळ भारतातच नव्हे तर जगातील 33 देशांनी या उठावाची दखल घेतली. जनतेनेही या उठावाला प्रतिसाद दिला. आज शिवसेनेचे 60 आमदार आहेत. एक दिवस असा येईल की विरोधकांचे सगळे तंबू रिकामे होतील. आधीचे सरकार स्थगिती सरकार होते आताचे सरकार प्रगतीचे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचे काम आम्ही करत आहोत, असे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Comments are closed.