चिंता नको! एआयमुळे नोकऱ्या निर्माण होतील, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केले स्पष्ट

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (एआय) नोकऱ्या धोक्यात आल्याची चिंता व्यक्त होत आहे. एआयमुळे तब्बल एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आल्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी लक्षवेधी वक्तव्य केले. एआयमुळे नोकऱ्या जाणार नाहीत, उलट कर्मचाऱ्यांसाठी ते मदतीचे ठरेल, असे सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले. कंपनी नवीन उत्पादने आणि नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करत असून त्यामुळे भविष्यात अधिक नोकऱ्या निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सॅन फ्रॉन्सिस्को येथे सुंदर पिचाई म्हणाले, एआय कामात वेग वाढवण्याचे टूल आहे. एआयच्या मदतीने काम जास्त वेगाने होणार आहे. एआयमुळे गुगलमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार नाही तर भविष्यात वाढेल. एआयच्या मदतीने नवीन उत्पादने तयार केली जातील आणि त्यामुळ नोकऱ्या वाढतील. गुगलमध्ये यापूर्वी काही कर्मचाऱ्यांना काढून टाकले गेले आहे, हे खरे आहे. 2023 मध्ये कंपनीने 12 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आणि गेल्या वर्षी एक हजाराहून अधिक लोकांना कमी केले. 2025 मध्ये ही संख्या खूपच कमी असल्याचे पिचाई यांनी सांगितले.
सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले की, एआयमुळे कर्मचाऱ्यांना घाबरून जाण्याची अजिबातच गरज नाहीये. एआय कोणाच्याही नोकऱ्या काढून घेणार नाही.
Comments are closed.