Sharad Pawar expects proper planning from the railway administration


रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्त्वाच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचे आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात.

(Mumbra accident) पुणे : मुंब्रा येथे सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात पाच रेल्वेप्रवाशांचा मृत्यू झाला. अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलमधील 8 प्रवासी दिवा आणि मुंब्रा स्थानकाजवळ एकमेकांना घासून खाली पडले. हे सर्व प्रवासी फूटबोर्डवर प्रवास करत होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. मृत्यूचे खापर प्रवाशांवर फोडू नका, असे सांगतानाच योग्य नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी रेल्वे प्रशासनाला केले आहे. (Sharad Pawar expects proper planning from the railway administration)

मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे सांगून ते म्हणतात, मध्य रेल्वेवर दररोज सरासरी 6 ते 7 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचे मुख्य कारण असल्याचे सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्त्वाच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचे आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची ठरलेल्या वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवारांनीही व्यक्त केली चिंता

मुंब्रा अपघाताबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूने उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्द्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. उपनगरी रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावले उचलेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Mumbra accident : अजित पवार म्हणतात, प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज…





Source link

Comments are closed.