IND vs ENG: 18 वर्षांनंतर इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर भारत, गिलकडून नव्या युगाची सुरुवात?
विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार मानले जातात. पण त्यांनी त्यांच्या मोठ्या करिअरमध्ये एकदाही इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली नाही. टीम इंडियाने (Team india) शेवटची 18 वर्षांआधी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. आता 18 वर्षानंतर कसोटी कर्णधार गिलकडे (Shubman gill) इतिहास रचण्याची संधी आहे, गिलच्या नेतृत्वात भारताला इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे, ज्याची सुरुवात 20 जून पासून होणार आहे.
इंग्लंड मालिकेत गिल पहिल्यांदा कर्णधार म्हणून खेळणार आहे, त्याच्यासाठी हे आव्हान सोपे नसणार आहे. पण गिलच्या संघात के एल राहुल (KL Rahul),जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah),रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांसारखे अनुभवी दिग्गज खेळाडू सामील आहेत. जे एकट्याच्या जोरावर सामना पलटवण्याची क्षमता ठेवतात. अशा परिस्थितीत टीम इंडिया इंग्लंडसाठी मोठी आव्हान असेल. त्याचबरोबर असे सुद्धा होऊ शकते की, टीम इंडिया इंग्लंडला मात देऊन ही मालिका जिंकेल. जर ही टीम असे करण्यात यशस्वी झाली, तर 18 वर्षानंतर इतिहास रचला जाईल. जेव्हा भारतीय संघ इंग्लंडमध्ये मालिका जिंकेल. भारतीय संघाने 2007 मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती, तेव्हा भारतीय संघाचे कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) होते.
भारतीय संघ आणि इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 20 जून रोजी होणार आहे, दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात जुलैमध्ये होणार आहे. तसेच तिसरा सामना 10 जुलैमध्ये लॉर्ड्समध्ये खेळला जाईल. मालिकेतील चौथा सामना 23 जुलैमध्ये मैनचेस्टर होईल. तसेच मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलै रोजी इंग्लंडच्या ओवलमध्ये होणार आहे.
Comments are closed.