टीएनपीएलमध्ये आर अश्विनवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप! जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

आर अश्विन: भारताचा अनुभवी क्रिकेटर रविचंद्रन अश्विनवर तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) दरम्यान चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मदुराई पँथर्स संघाने अश्विन आणि त्याच्या फ्रँचायझीविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पँथर्सने आरोप केला आहे की, (14 जून) रोजी झालेल्या सामन्यादरम्यान अश्विन आणि त्याच्या संघाने चेंडूमध्ये फेरफार केला. (Ball tampering) या प्रकरणी TNPL च्या आयोजकांनी पँथर्स संघाकडून पुराव्यांची मागणी केली आहे.

पँथर्सचा नेमका आरोप काय?
पँथर्सने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, डिंडीगुल ड्रॅगन्सने चेंडू जड करण्यासाठी रसायनाने भिजवलेल्या टॉवेलचा वापर केला. त्यांनी असाही आरोप केला की, चेंडूशी छेडछाड केल्यामुळे तो बॅटला लागल्यावर त्यातून धातूसारखा आवाज येत होता. (Match fixing allegations)

या प्रकरणावर टीएनपीएलचे सीईओ प्रसन्ना कन्नन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “त्यांनी (पँथर्सने) तक्रार दाखल केली आहे, जी आम्ही स्वीकारली आहे. जरी त्यांना सामना झाल्यानंतर 24 तासांच्या आत कोणतीही तक्रार दाखल करावी लागत असली तरी, आम्ही ती स्वीकारली आहे आणि त्यांना त्यांच्या आरोपांचे पुरावे देण्यास सांगितले आहे. जर आम्हाला त्यांच्या आरोपांमध्ये काही सत्यता आढळली, तर आम्ही एक समिती स्थापन करू. पुरेसे पुरावे असल्याशिवाय कोणत्याही खेळाडू आणि इतर फ्रँचायझीविरुद्ध असे आरोप करणे चुकीचे आहे. जर ते पुरावे देऊ शकले नाहीत, तर त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागेल.” (Prasanna Kannan Statement)

मदुराई पँथर्सने (14 जून) रोजी आपला सामना अश्विनच्या डिंडीगुल ड्रॅगन्स संघाशी खेळला होता. याच सामन्यानंतर पँथर्सने अश्विन आणि डिंडीगुल संघावर आरोप केले. या सामन्यात अश्विनच्या संघाने पँथर्सला 9 गडी राखून पराभूत केले होते. पँथर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत केवळ 150 धावा केल्या. तर अश्विनच्या संघाने हे लक्ष्य 12.3 षटकांत केवळ 1 गडी गमावून सहज गाठले.

Comments are closed.