बुमराहने स्वतःहून सोडले कर्णधारपद, BCCIची मोठी ऑफर का नाकारली? कारण ऐकून तुम्हालाही बसले धक्का
जसप्रिट बुमराह चाचणी कर्णधार बातम्या: 7 मे 2025 रोजी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. त्याआधीच जसप्रीत बुमराह किंवा शुभमन गिल यापैकी एक भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार होऊ शकतो अशी अटकळ सुरू झाली होती. पण 24 मे रोजी बीसीसीआयने शुभमन गिलला भारताच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले. कर्णधारपदाच्या या शर्यतीत जसप्रीत बुमराह कसा मागे पडला? भारतीय कसोटी संघाचा कर्णधार न होण्यावर स्वतः बुमराहने प्रतिक्रिया दिली आहे. (Jasprit Bumrah on not becoming India Test captain)
जसप्रीत बुमराहने केला मोठा खुलासा
स्काय स्पोर्ट्सशी बोलताना जसप्रीत बुमराहने यावर खुलासा केला. तो म्हणाला की, “रोहित आणि विराटच्या निवृत्तीपूर्वी आणि आयपीएल दरम्यान मी बीसीसीआयशी बोललो होतो की, मी भारत-इंग्लंड मालिकेपूर्वी माझ्या वर्कलोडचा कामाचा विचार केला. त्यावेळी मी माझ्या पाठीवर ताण येऊ नये म्हणून माझ्या फिटनेस टीमशी चर्चा केली होती. त्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला होता की आता थोडं स्मार्टवर्क करायला हवं.मग मी बीसीसीआयला फोन केला की आणि सांगितले की कर्णधारपदासाठी तयार नाही. कारण मी सर्व कसोटी सामने खेळू शकणार नाही.
बुमराहने नाकारली मोठी ऑफर
नंतर जसप्रीत बुमराह म्हणाला की, बीसीसीआय माझ्याकडे कर्णधारपदाच्या भूमिकेत पाहत होते, परंतु मला त्यांना नाही म्हणावे लागले. कारण जेव्हा मालिकेतील 3 सामन्यात मी नेतृत्व केलं आणि उरलेल्या दोन सामन्यात दुसरा खेळाडू नेतृत्व करेल, तर हे संघासाठी योग्य नाही. त्यामुळे मी संघाला प्राधान्य दिले.’
पाठीच्या दुखापतीने बुमराह त्रस्त
गेल्या काही वर्षांत पाठीच्या दुखापतीने बुमराहला खूप त्रास दिला आहे. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली होती, तरीही तो दौऱ्याच्या शेवटच्या सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे मध्येच मैदान सोडले होते. त्यानंतर, तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत, बुमराह त्याच्या भविष्याचा विचार करून कोणताही धोका पत्करू इच्छित नाही, जेणेकरून तो संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.
शुभमन गिल करणार संघाचे नेतृत्व
आता इंग्लंड दौऱ्यावर शुभमन गिल पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे. ऋषभ पंतला कसोटी संघात उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. गेल्या 18 वर्षांपासून टीम इंडियाने इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नसल्याने गिलवरही दबाव असेल.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल
आणखी वाचा
Comments are closed.