Rohini Khadse’s attack on BJP, referring to Vajpayee
वाजपेयी हे मोठे तत्ववादी नेते होते. जुन्या भाजपामध्ये लोक तत्वांना फार महत्त्व द्यायचे, पण नवभाजपामध्ये सर्व तडजोडच सुरू आहे. जुन्या भाजापमध्ये हिंदूत्व, राष्ट्रप्रेमाला प्राधान्य होते, आज नवभाजपमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी अगदी दहशतवाद्यांच्या सहकाऱ्यांशीही हात मिळवला जात आहे.
(Rohini Khadse on Badgujar) मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी केलेले नेते सुधाकर बडगुजर यांनी काल, मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. विशेष म्हणजे, साधारणपणे दीड वर्षांपूर्वी भाजपानेच सुधाकर बडगुजर यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासोबत संबंध असल्याचा आरोप थेट विधानसभेत केला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा दाखला देत भाजपावर हल्लाबोल केला आहे. (Rohini Khadse’s attack on BJP, referring to Vajpayee)
तत्कालीन भाजपा आमदार नितेश राणे यांनी 15 डिसेंबर 2023 रोजी शिवसेना ठाकरे गटाचे तत्कालीन नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या सलीम कुत्ता या दोघांचे फोटो विधानसभेत दाखवले होते. बडगुजर यांना कोणाचा वरदहस्त आहे, हिंदुत्ववादी असणाऱ्या पक्षाकडून त्यांना कसे संरक्षण दिले जाते, असे सांगत त्यांनी ठाकरे गटावर शरसंधान केले होते. तसेच, शिवसेना भवन बॉम्बस्फोटाने उडवण्याचा कट करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही समोर आणावे, अशी मागणी नितेश राणे यांनी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुधाकर बडगुजर यांची जोरदार पाठराखण केली होती. पण याच बडगुजर यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे.
हेही वाचा – Sanjay Raut letter : …तर इतर स्फोट नाइलाजाने करावे लागतील, संजय राऊतांचा फडणवीसांना इशारा
यावरून रोहिणी खडसे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. ‘पार्टी तोड़कर सत्ता के लिए नया गठबंधन करके अगर सत्ता हाथ में आती है, तो मैं ऐसी सत्ता को चिमटे से भी छूना पसंद नहीं करूंगा…’ असे देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयीजी एकदा म्हणाले होते. त्यांनी हे शेवटपर्यंत पाळले, असे त्यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=AHdpx_TDTU8
अटलबिहारी वाजपेयी हे मोठे तत्ववादी नेते होते. जुन्या भाजपामध्ये लोक तत्वांना फार महत्त्व द्यायचे, पण नवभाजपामध्ये सर्व तडजोडच सुरू आहे. जुन्या भाजापमध्ये हिंदूत्व, राष्ट्रप्रेमाला प्राधान्य होते, आज नवभाजपमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी अगदी दहशतवाद्यांच्या सहकाऱ्यांशीही हात मिळवला जात आहे. मग अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की, कुठे गेली संवेदनशीलता? कुठे गेले देशप्रेम, कुठे गेले आपले हिंदुत्व? असा टोला त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा – Raj Thackeray : शाळा हिंदी कशी शिकवतात, हे बघतोच…; राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा
Comments are closed.