Uddhav Thackeray stops his speech after chaos in Shanmukhanand Hall
मेळाव्यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदीर टीका केली. मात्र उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना गोंधळ झाला. त्यामुळे त्यांना आपलं भाषण थांबवावं लागलं.
मुंबई : दोन्ही शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईत पार पडत आहे. शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. मेळाव्यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदीर टीका केली. मात्र उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना गोंधळ झाला. त्यामुळे त्यांना आपलं भाषण थांबवावं लागलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. (Uddhav Thackeray stops his speech after chaos in Shanmukhanand Hall)
षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी सभागृहाच्या बाल्कनीमध्ये गोंधळ उडाला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आपलं भाषण थांबवावं लागलं. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या, खाली आणि वर कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. त्यांना आत यायला जागा नाही. इथे खाली कुठे जागा आहे का पाहा. वरती बसलेली लोकं त्यांना सांभाळत आहेत. आपण इथलं सांभाळून घेऊ, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. मात्र गोंधळ सुरू असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे बसलेले अनिल देसाई उठले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.
हेही वाचा – Politics : मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर, उद्धव ठाकरे त्यांचं जास्त ऐकतात; शिंदे गटाची टीका
हिंदी भाषेच्या सक्तीवरून फडणवीसांना आवाहन
राज्यात हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला भांडून चालणार नाही. भाजपची जी नीती आहे, त्यांनी विधानसभेत नारा दिला होता. बटेंगे ते कटेंगे. आपल्याला वाटलं हिंदू मुसलमान. पण आता मुंबईत हिंदू हिंदूत मारामाऱ्या लावायच्या. हिंदी सक्ती करायची. हिंदी सक्तीची झाली की, 93 ला ज्या लोकांना वाचवले होते. त्यांनाच आपल्यापासून तोडायचे. पण राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नाही. त्यांच्यात हिंदी सक्ती करायची हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीस तुम्ही करून दाखवाच, असे आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदीबद्दल आमचे वैर नाही, पण सक्ती कशासाठी? हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळनाडूमध्ये जाऊन पाहा, काय करतात ते. हिंदीची सक्ती गुजरातमध्ये केली नाही. आधी गुजरातमध्ये हिंदी सक्तीची करा. इथे आपल्याला भांडत ठेवायचे, मराठी अमराठीत भांडणं लावायची आणि मग हे भष्ट्राचार करायला मोकळे, असा घणाघाती टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
हेही वाचा – Uddhav Thackeray : राजकारणात पोरं नसलेले…; वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Comments are closed.