Hindi language dispute is politics by devendra fadnavis raj thackeray alleges congress leader nana patole in marathi
जनतेत सरकारविरोधात प्रचंड रोष आहे आणि सरकारकडे पैसेही नाहीत. सरकार या सगळ्यावर समाधानकारक उत्तरही देत नाही. हे सर्व विषय मागे पडावेत म्हणूनच हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक बाहेर काढण्यात आला आहे असं त्यांनी म्हटलं.
Nana Patole : मुंबई : राज्यात सध्या अनेत ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक उकरून काढण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतरच हिंदी भाषेचा शासन निर्णय कशा आला?असा सवाल करत, या षडयंत्रामागे फडणवीस आणि राज ठाकरे यांची मिलिभगत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी गुरुवारी केला. (hindi language dispute is politics by devendra fadnavis raj thackeray alleges congress leader nana patole)
राज्यात सध्या तिसरी भाषा शिकण्यावरून चांगलाच गदारोळ सुरू आहे. यासंदर्भात नाना पटोलेंनी पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले की, अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्वांकडून शेतकरी कर्जमाफीची मागणी होत जात आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची मागणीही होत आहे. बेरोजगारी आणि महागाई तर प्रचंड आहे. जनतेत सरकारविरोधात प्रचंड रोष आहे आणि सरकारकडे पैसेही नाहीत. सरकार या सगळ्यावर समाधानकारक उत्तरही देत नाही. हे सर्व विषय मागे पडावेत म्हणूनच हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक बाहेर काढण्यात आला आहे असं त्यांनी म्हटलं.
हेही वाचा – PM Modi Gifts : पितळेचा बोधी वृक्ष, मधुबनी पेंटिंग…पंतप्रधान मोदींनी दिल्या वैशिष्ट्यपूर्ण भेटी
यामागे राजकारण असून फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांनाही विद्यार्थी शिक्षण तसेच भाषा याबद्दल काहीही देणेघेणे नाही. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका कधीही होऊ शकतात. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद चव्हाट्यावर आणला आहे. या दोघांनाही यातून राजकीय पोळी भाजायची आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला.
मराठी भाषा, संस्कृती जपलीच पाहिजे. पहिलीपासून विद्यार्थ्यांवर हिंदीचे ओझे नसावेच, याबाबत दुमत नाही. पण हिंदी भाषेचा वाद हा शैक्षणिक मुद्दा न करता त्याला राजकीय स्वरुप देण्यात आले आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी पहिलीपासून हिंदी अनिवार्य करणार नाही, असे सांगितले. पण मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेताच वादग्रस्त शासन निर्णय कसा निघाला? आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतविभाजन करून त्याचा फायदा भाजप आणि मनसेला व्हावा हा यामागे हेतू आहे. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर असा हा प्रकार आहे, असेही पटोले म्हणाले.
Comments are closed.