आषाढी वारीच्याआधी तरुण वारकऱ्याचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

चंद्रभागा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम ज्ञानेश्वर पावले (वय 27, रा. बेळगाव) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली. शुभम व त्याचे नातेवाईक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीचे स्नान करण्यासाठी हे सर्व कुटुंब भक्त पुंडलिक मंदिराजवळ गेले.
पहाटेच्या अंधुक प्रकाशात शुभमने चंद्रभागा नदीत उडी घेतली. पाण्याचा वाढता प्रवाह आणि पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने, शुभम पाण्यात वाहून गेला. नदीवर फारशी गर्दी नसल्याने शुभम बुडतोय हे कोणाच्याही लक्षात आले नाही. बराच वेळ झाला अंघोळीला गेलला शुभम कसा आला नाही म्हणून शोध घेतला असता सकाळी 11 वाजता शुभमचा पात्रामध्ये आढळून आला. शुभमच्या अनपेक्षित दुर्घटनेमुळे त्याच्या कुटुंबाला दुःख अनावर झाले.
वाळू चोरीमुळे चंद्रभागा पात्रात मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक भाविकांना आपला जीव गमवावा लागत आहे. वाळू चोरी रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
Comments are closed.