शॉक, स्लो क्लायडर, हायकॉर्न सुपारी

मुंबईतील निष्पाप नागरिकांचा रेल्वे अपघातात दररोज बळी जात असल्याने हायकोर्टाने आज गंभीर चिंता व्यक्त केली. रेल्वे अपघातादरम्यान दररोज दहा जणांना आपल्या जिवाला मुकावे लागते हे अत्यंत धक्कादायक असून भविष्यात असे अपघात होणार नाहीत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला दिले. एवढेच नव्हे तर अपघात टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार व कधीपर्यंत त्याची अंमलबजावणी करणार, असा सवाल करत न्यायालयाने या प्रकरणी रेल्वेला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास बजावले.
दररोज होणाऱ्या अपघातांत लोकांना आपल्या जिवाला मुकावे लागत असून सुरक्षित प्रवासासाठी पालघर येथील यतीन जाधव यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. 9 जून रोजी मुंब्रा येथे झालेल्या अपघाताची हायकोर्टाने आज दखल घेतली.
दरम्यान, सुनावणीवेळी या समितीतील सदस्यांच्या पात्रततेबाबत याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेत नेमलेले सदस्य तज्ञ नसल्याचा दावा केला. याची खंडपीठाने दखल घेत या समितीतील सदस्यांच्या पात्रतेबद्दल माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
Comments are closed.