IND vs ENG: तिसरा शतकवीर कोण? यशस्वी-गिलच्या शतकांनंतर सचिनला आठवले जुने दिवस!

हेंडिंग्ले कसोटी सामन्यात भारतीय संघाचे शानदार प्रदर्शन बघून क्रिकेटच्या दुनियेतील दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) खूप आनंदी आहेत. त्यांनी एक्स वर पोस्ट करत युवा फलंदाजांचे खूप कौतुक केले आहे, याशिवाय त्यांनी एक प्रश्न देखील उपस्थित केला आहे ते म्हणाले आहेत की या डावामध्ये तिसरा शतकवीर कोण असेल?

साल 2002 मध्ये भारतीय संघाकडून हेंडिंग्लेमध्ये एकूण तीन फलंदाजांनी शतक झळकावले होते. ज्यामध्ये सचिन तेंडुलकर यांच्याशिवाय सौरव गांगुली (Saurav Ganguly) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचे देखील नाव सामील आहे. या तीन फलंदाजांनी शानदार खेळ करत त्यादरम्यान टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर पराभूत केले होते.

पण त्यानंतर भारतीय संघाला सतत पराभव पत्करावा लागला आहे. अशामध्ये आता लीड्स कसोटी सामन्यातील पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) आणि शुबमन गिल (Shubman gill) शतक झळकावले. ते पाहून सचिन तेंडुलकर यांना खूप आनंद झालेला आहे. त्यांना आशा आहे की, यावेळी अनेकदा खेळाडू चांगली खेळी करत शतक झळकावतील. याच कारणाने त्यांनी पोस्ट करत त्यामध्ये विचारले आहे की, लीड्समध्ये तिसरा शतकवीर कोण असेल?

हेंडिंग्ले कसोटी पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर सचिन तेंडुलकर यांनी म्हटले आहे की, के एल राहुल (Kl Rahul) आणि यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) यांनी ज्या प्रकारे शानदार पाया रचला. त्यामुळे टीम इंडिया (Team india) पहिल्या दिवसाला शानदार पद्धतीने पार पाडण्यात यशस्वी ठरली. यशस्वी आणि शुबमन गिलला त्याचा शानदार शतकांसाठी माझ्या शुभेच्छा. पंतच योगदान देखील तितकच संघासाठी महत्त्वाचे ठरलं.

पुढे ते म्हणाले, भारतीय संघाच्या फलंदाजीने मला आज 2002 मध्ये खेळल्या गेलेल्या हेडिंग्ले कसोटी सामन्याची आठवण करून दिली. जेव्हा राहुल, सौरव गांगुली आणि मी पहिल्या डावात शतक झळकावले होते आणि आम्हाला विजय मिळाला होता.

Comments are closed.