Sanjay Raut Shivsena UBT on marathi and hindi languange conflict in Maharashtra


मुंबई : महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा हिंदी सक्तीवरून सरकारवर निशाणा साधला आहे. “हिंदीची सक्ती म्हणजे महाराष्ट्रातील मराठीपण नष्ट करण्याचा हा सर्व डाव आहे. गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही. पंतप्रधान मोदींनी अनेकदा भाषणातून गुजराती जनतेला, ‘तुम्ही हिंदीची सक्ती सहन करणार आहात का?’ असे प्रश्न जाहीरपणे विचारले आहेत. मग, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदी महाराष्ट्रावर का लादत आहेत?” असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला. (Sanjay Raut Shivsena UBT on marathi and hindi languange conflict in Maharashtra)

हेही वाचा : Ashish Shelar : उबाठा सेनेची अवस्था धोकादायक आणि जिर्ण; नगरसेवकांच्या प्रवेशावेळी शेलारांची टीका 

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी शाळा या अधिक अभिजात कशा होतील? यासाठी काम केले पाहिजे. मुंबईसारख्या शहरात मराठी शाळा या बंद पडल्या नाहीत तर बंद पाडल्या जात आहेत. हे एक अतिक्रमण असून त्यावर आता हिंदीची सक्ती. या तिसऱ्या भाषेची आम्हाला गरज नाही,” अशा शब्दात संजय राऊत यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवर आपली भूमिका मांडली. “अनेक लेखक, कवी, अभिनेते यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात आपले पुरस्कार परत करत आहेत. त्यांचे मी अभिनंदन करत आहे. महाराष्ट्रमध्ये अनेकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मराठीच्या छातीवर एक भाषा बसवून मुंबईसह महाराष्ट्रामधून मराठी नष्ट करण्याचे जे कारस्थान चालू आहे, त्याविरुद्ध हे हत्यार उचलायलाच हवे.” असे ते म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदी सक्तीविरोधात आंदोलन सुरु केले आहे. “मनसेकडून या विषयावर आंदोलन सुरु झाले आहे. शिवसेना उबाठा हा राज्यात प्रमुख पक्ष आहे. आम्ही विधानसभेच्या अधिवेशनात या प्रश्नावर सरकारला जाब विचारु,” असे खासदार संजय राऊत म्हणाले. “हिंदी सक्ती ज्या पातळीवर सुरु आहे. कोणाला तरी मुंबई घशात घालायची आहे, या मुंबईतून मराठी भाषा आणि मराठी माणूस हद्दपार करायचा आहे. यासाठी जर ही कारस्थाने सुरु आहेत. शिवसेनेचा जन्म हा मराठी भाषेवर होणारे अतिक्रमण थांबण्यासाठी झाला आहे.” असे ते यावेळी म्हणाले.



Source link

Comments are closed.