IND vs ENG: पहिल्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस, विजयासाठी टीम इंडियाला करावी लागतील ही 3 महत्वाची कामे!
लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंड वर खेळला जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे (Test Series IND vs ENG Day 5). इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी 365 आणि भारतीय संघाला जिंकण्यासाठी 10 विकेट्सची गरज आहे. 2018 पासून इंग्लंड संघ या ग्राउंडवर कधीही ड्रॉ खेळलेला नाही, त्यांनी सर्व सामने जिंकलेले आहेत, पण कर्णधार गिल (shubman gill) आणि टीम इंडियाकडे (Team india) इतिहास रचण्याची संधी आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) वर सगळ्यांच्या नजरा असतील, कारण तो इंग्लंडच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. जाणून घ्या कोणती तीन महत्त्वाची कामे आहेत, जी टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकतात.
पहिल्या डावात भारताने 471 आणि इंग्लंडने 465 धावा केल्या होत्या, दुसऱ्या डावात भारतीय संघाने 365 धावा केल्या आणि इंग्लंडला जिंकण्यासाठी 371 धावांचं आव्हान मिळालेलं आहे. चौथ्या दिवसाच्या शेवटी इंग्लंड 21 धावांवर आहे, त्यांची एकही विकेट पडलेली नाही. आता पाचव्या दिवशी त्यांना जिंकण्यासाठी 350 धावांची गरज आहे, त्यामुळे भारतीय गोलंदाजांवर टीम इंडियाचा सर्व विजय अवलंबून आहे.
1. जसप्रीत बुमराहला बाकीच्या गोलंदाजांची साथ मिळणे आवश्यक!
जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पहिल्या डावात शानदार सुरुवात करून दिली होती, पण त्याला दुसऱ्या गोलंदाजांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. त्या कारणाने इंग्लंड संघ 465 धावांपर्यंत पोहोचू शकला. पण आज बुमराहला प्रसिद्ध कृष्णा (Prasiddh Krishna) आणि मोहम्मद सिराजची (Mohmmed Siraj) यांची साथ मिळणे आवश्यक आहे. जर हे गोलंदाज विकेट देण्यात यशस्वी ठरले नाहीत, तर शुबमन गिलला शार्दुल ठाकूरकडे चेंडू द्यावा लागेल, मागच्या डावामध्ये शार्दुल कडून फक्त 6 षटके टाकण्यात आली होती. प्रसिद्ध आणि सिराज मागच्या डावामध्ये खूप महाग ठरले. त्यांना धावा वाचवाव्या लागतील आणि विकेट्स सुद्धा घ्यावा लागतील.फक्त जसप्रीत बुमराहच्या एकट्याच्या जोरावर टीम इंडियाला जिंकणे अवघड होईल.
2.क्षेत्ररक्षणामध्ये सुधार
भारतीय संघाची सर्वात मोठी कमजोरी त्यांचे क्षेत्ररक्षण राहिलेली आहे. मागच्या डावात भारतीय संघाकडे 6 नाही तर 100 धावांची आघाडी राहिली असती, जर त्यांनी चांगली फिल्डिंग केली असती. भारतीय खेळाडूंनी त्या डावात 6 झेल सोडले होते, जे खूप महाग ठरले. ही चूक दुसऱ्या डावात होता कामा नये. भारतीय खेळाडूंनी चांगली फिल्डिंग करणे गरजेचे आहे.
3.पहिल्या सेशनमध्ये विकेट मिळणे आवश्यक
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी पहिलं सेशन महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या संघाने यामध्ये बाजी मारली मग सामना त्यांच्याच नावावर झाला. भारतीय संघाला पहिल्या सेशनमध्ये 3 विकेट्स मिळणे गरजेचे आहे, कारण रिपोर्ट नुसार आज लीड्समध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. काल अशाच परिस्थितीत के एल राहुलने सांभाळून फलंदाजी केली होती आणि आज बुमराह आणि सिराजला हेच हवे असेल की इंग्लंड संघाच्या टॉप ऑर्डरला बाद करणे.
बुमराह समोर जॅक क्रॉली काल संघर्ष करताना दिसला होता, अशा परिस्थितीत संभावना आहे की, भारतीय गोलंदाज त्याला लवकर बाद करतील. ओली पोप, जो रूट आणि बेन स्टोक आज सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज असतील आणि भारतीय संघाला त्यांना लवकर बाद करणे आवश्यक आहे.
Comments are closed.