Hearing in Bombay High Court regarding irregular voting in Maharashtra Assembly elections completes
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर 76 लाख लोकांनी मतदान केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आज (23 जून) पूर्ण झाली आहे.
मुंबई : नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. मात्र या निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर वाढीव मतदानाचा आरोप करत विरोधक सातत्याने निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही वाढीव मतदानावरून निवडणूक आयोगावर टीका करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आता वाढीव मतदानाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता निकालावर लागले आहे. (Hearing in Bombay High Court regarding irregular voting in Maharashtra Assembly elections completes)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडली होती. या निवडणुकीत महायुतीने 288 जागांपैकी 235 जागा जिंकल्या होत्या, तर महाविकास आघाडीला फक्त 49 जागा मिळाल्या होत्या. महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या भाजपाने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या होत्या. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसने सर्वाधिक 16 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 आणि शिवसेनेला ठाकरे गटाला 20 जागा मिळाल्या होत्या. मात्र निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर महाविकास आघाडीने वाढीव मतदान केल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली होती.
हेही वाचा – Nitesh Rane : …त्यावर आझमीसारखं कार्ट काहीच बोलत नाही; एकेरी उल्लेख करत राणेंची सडकून टीका
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर 76 लाख लोकांनी मतदान केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 नंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी तफावत असल्याचे सुनावणीवेळी नमूद केले होते. तसेच विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने नियमांचे पालन केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता.याशिवाय सायंकाळी 5 नंतर झालेल्या मतदानाचा व्हिडीओ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.
प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आज (23 जून) पूर्ण झाली आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आज मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतांच्या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले असून निकाल 25 जून जाहीर होणार आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालय वाढीव मतदानाबाबत काय निकाल देतो, हे पाहावे लागेल.
हेही वाचा – Politics : कोणी कितीही मिठाचा खडा टाकला तरी…; सेना-मनसे युतीवर काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
Comments are closed.