पहिलीपासून हिंदी भाषा हवी की नको, पहिल्या प्रतिक्रियेत शरद पवारांकडून एक घाव, दोन तुकडे!
हिंदी भाषेवर शरद पवार अनिवार्य: इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदीला तृतीय भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याच्या निर्णयावर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘त्रिभाषा सूत्रा’ संदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेण्याआधी साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते तसेच संबंधित घटकांशी सखोल चर्चा केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सोमवारी रात्री या विषयावर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारच्या धोरणात्मक भूमिकेवर चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित घटकांशी संवाद साधल्यानंतर देशातील इतर राज्यांमधील त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी आणि परिस्थिती जनतेसमोर मांडली जाईल. त्यानंतरच राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सूचित केले आहे. आता हिंदी भाषा सक्तीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
शरद पवारांकडून एक घाव, दोन तुकडे!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्रिभाषा सूत्रावर भाष्य करत हिंदी भाषेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषेची सक्ती योग्य नाही. मात्र हिंदी भाषा शिकणंही तितकंच महत्त्वाचं आहे. देशातील सुमारे 55 टक्के नागरिक हिंदी भाषा बोलतात, त्यामुळे हिंदीचा विरोध करण्याची गरजही नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. सध्या इयत्ता पाचवीपासून पुढे हिंदी शिकवली जाते, पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती नको, असेही त्यांनी नमूद केले आहे.
भारताची बघ्याची भूमिका अचंबित करणारी
इराण आणि इस्रायलमधील युद्धावर शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. भारत सरकारने या संवेदनशील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बघ्याची भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. “आतापर्यंत भारताने आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्ये एका स्पष्ट भूमिकेची मांडणी केली होती. मात्र या वेळी भारत बघ्याची भूमिका घेत आहे, हे अचंबित करणारं आहे,” असं पवार यांनी स्पष्टपणे म्हटलं. पुढे बोलताना त्यांनी अरब देशांतील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही चिंता व्यक्त केली. “अरब देशांत मोठ्या प्रमाणावर भारतीय वास्तव्यास आहेत. त्यामुळे या संघर्षाचा त्यांच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात,” असं शरद पवार यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.