As soon as Ajit Pawar won the Malegaon Sugar Factory election, Sharad Pawar launched a scathing attack


माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकारी पदावर असताना आपण कधी सहकारी संस्थांची निवडणूक निवडणूक लढवली नाही, असा टोला शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला आहे.

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राज्यात साखर कारखाना, बाजार समितीच्या आणि दूध संघाच्या निवडणुका होताना दिसत आहेत. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकारी पदावर असताना आपण कधी सहकारी संस्थांची निवडणूक निवडणूक लढवली नाही, असा टोला शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला आहे. (As soon as Ajit Pawar won the Malegaon Sugar Factory election, Sharad Pawar launched a scathing attack)

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळिराजा सहकार बचाव पॅनेल, भाजपा नेते चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, तर अपक्षांचे एक पॅनेल, असे पाच पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात होते. महत्त्वाचे म्हणजे स्वत: अजित पवार हे कारखान्याच्या निवडणुकीत उभे आहेत. काही वेळापूर्वीच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. या निकालानुसार, ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. निवडणुकीवेळी 102 पैकी 101 मतं वैध ठरली. त्यातील 91 मतं मिळवून अजित पवारांनी निवडणुकीत बाजी मारली आहे. मात्र अजित पवार विजयी होताच शरद पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Fadnavis Vs Rahul Gandhi : झूठ बोले कौवा काटे…, राहुल गांधींच्या दाव्याला फडणवीसांचे प्रत्युत्तर

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार आज बारामतीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत होते. यावेळी त्यांना अजित पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवली नाही. परंतु, विरोधकांना जर काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती जो कारखान्याचा प्रमुख असेल, तर तो न्याय कसा देईल? असा टोला शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला.

हेही वाचा – Maharashtra Election : फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यांत वाढले 8 टक्के मतदार, राहुल गांधींचा दावा



Source link

Comments are closed.