Rohit Pawar’s criticism of Mahayuti over royal dinner of Estimates Committee


काही दिवसांपूर्वी धुळ्यात उडालेली पाच कोटी रुपयांची धूळ डोळ्यात जाऊन पाहुण्यांचे डोळे चुरचुरू नयेत आणि चांदीच्या ताटांचा लखलखाट पाहून त्यांचे डोळे दिपावेत (की विस्फरावेत?) यासाठी तर देशभरातील पाहुण्यांचा सरकारी पाहुणचार चांदीच्या ताटात केला नाही ना, अशी शंका येते.

(Rohit Pawar on Mahayuti) अहिल्यानगर : संसदेतील अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र विधान भवनाता 23 आणि 24 जून या दिवशी एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी महाराष्ट्रात आलेल्या मान्यवरांच्या जेवणावळीचा शाही थाट आयोजित करण्यात आला आणि त्यासाठी लाखोंची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकावर टीकास्त्र सोडले आहे. (Rohit Pawar’s criticism of Mahayuti over royal dinner of Estimates Committee)

मुंबईत पार पडलेल्या संसदीय अंदाज समितीच्या परिषदेमध्ये 600 जण सहभागी झाले होते. यामध्ये 250 विशेष सदस्य आणि 250 अधिकारी यांचा समावेश होता. विधिमंडळाच्या परिसरात वातुनूकुलित आलिशान शामियाने उभे केले होते. या मान्यवरांची ताज पॅलेस आणि ट्रायडंटला राहण्याची सोय करण्यात आली होती. या हॉटेलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवासासाठी वाहने आणि मुंबईची सहल असेही नियोजन करण्यात आले होते. पण या परिषदेत जेवणावर जो लक्षावधींचा खर्च करण्यात आला आहे. परिषदेत आलेल्या सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारकडून खर्च केलेला निधी योग्य प्रकारे वापरला गेला आहे ना? हे प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन त्यांचे मूल्यांकन करण्याचे काम अंदाज समिती करते. निधीचा योग्य वापर आणि व्यवहारात पारदर्शकता, हे अंदाज समितीमुळेच शक्य होते. सरकारचा कारभार पारदर्शकतेने होण्यासाठी अंदाज समितीचे कार्य महत्त्वाचे आहे. मात्र, या परिषदेच्या निमित्ताने करण्यात आळेल्या वारेमाप खर्चावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

हेही वाचा – Parliament Estimate Committee : चांदीच्या ताटातून जेवणाची उधळण, अंदाज समितीचा अंदाजच येईना

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘X’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे का, हा आज प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी धुळ्यात उडालेली पाच कोटी रुपयांची धूळ डोळ्यात जाऊन पाहुण्यांचे डोळे चुरचुरू नयेत आणि चांदीच्या ताटांचा लखलखाट पाहून त्यांचे डोळे दिपावेत (की विस्फरावेत?) यासाठी तर देशभरातील पाहुण्यांचा सरकारी पाहुणचार चांदीच्या ताटात केला नाही ना, अशी शंका येते, असा टोला त्यांनी लगावला आहे.

एकीकडे लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे नसल्याने वेगवेगळ्या खात्यातून पैसे वर्ग केले जातात आणि दुसऱ्या बाजूला चांदीच्या ताटांवर अशा प्रकारे उधळपट्टी केली जाते, हा सरकारचा कोणता अंदाज आहे? असा खोचक प्रश्न रोहित पवार यांनी केला आहे.

हेही वाचा – Wadettivar on BJP : राज्य कर्जबाजारी पण चांदीच्या ताटाचा थाट; वडेट्टीवारांची सरकारवर टीका





Source link

Comments are closed.