‘मी घाबरून गेलो होतो', टी20 विश्वचषक फायनलसाठी रोहित शर्माकडून ‘त्या' खेळाडूचं खास कौतुक!
टीम इंडियाचा माजी टी20 कर्णधार रोहित शर्माने टी-20 विश्व कप 2024 च्या अंतिम सामन्याविषयी काही क्षण आठवत ते शेअर केलेले आहेत (Team india’s Former T- 20 Captain Rohit Sharma). जे एका कर्णाधारासाठी खूप अवघड आणि महत्त्वाचे असतात. रोहित शर्माने दक्षिण आफ्रिका विरुद्ध फायनल सामन्याविषयी म्हटले की, एक वेळ अशी होती जेव्हा टीम इंडियाने सुरुवातीच्या 3 विकेट्स खूप लवकर गमावल्या होत्या आणि त्यानंतर रोहितच्या डोक्यात खूप काही चालू होते.
त्याने स्टार स्पोर्ट्स वर बोलताना सांगितले की, कशा पद्धतीने संघाने अवघड वेळेत सामना त्यांच्याकडे फिरवला आणि विराट कोहलीने (Virat Kohli) कशा पद्धतीने त्या सामन्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, जेव्हा आम्ही 2024 टी20 विश्वकप फायनलमध्ये 3 खेळाडू खूप लवकर गमावले होते, तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मी अजिबात शांत स्थितीमध्ये नव्हतो आणि ड्रेसिंग रूममध्ये माझ्यावर दबाव आला होता. पण विराट कोहलीने शानदार खेळी केली त्याने अक्षर सोबत चांगली भागीदारी रचली. आम्हाला पारी दरम्यान फलंदाजी करण्यासाठी एका खेळाडूची गरज होती आणि विराटने शानदार खेळी केली.
आमच्या सर्वांसाठी तो अनुभव खूप महत्त्वाचा होता, कारण आम्ही खूप जवळ येऊन मागे जाण्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे तो क्षण आमच्यासाठी खास होता. आम्ही सावधानी पूर्वक योजना बनवल्या, प्रत्येक दिवशी कष्टाने मेहनत घेतली. सातत्याने हा विचार केला की, विश्वकप कशा पद्धतीने जिंकला जाऊ शकतो. त्यामुळे त्या दिवशी प्रत्येक खेळाडूच्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या.
पुढे रोहित म्हणाला, जेव्हा 2024 टी20 विश्वकप मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरलो होतो, तेव्हा माझ्या डोक्यात फक्त हेच होते की मला कोणत्याही प्रकारे मोठी धावसंख्या करायची आहे. मला त्यांच्याविरुद्ध चांगले खेळायचे आहे आणि मला प्रत्येक ऑस्ट्रेलिया गोलंदाजाविरुद्ध आक्रमण करायचे होते.
Comments are closed.