हिंदीची सक्ती कराल तर आमची शक्ती अशी दाखवू की तुम्ही पुन्हा डोकं वर काढणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले

”तुमच्या सात पिढ्या जरी उतरल्या तरी हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. आणि तसा प्रयत्न जरी कराल तर तुम्हाला आमची शक्ती अशी दाखवू की तुम्ही पुन्हा डोकं वर काढणार नाही”, अशा खणखणीत इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व महायुती सरकारला दिला. वरळीतील विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत भाजपची व मिंध्यांचा समाचार घेत त्यांची चांगलीच सालटी काढली. या विजयी मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाकरे बंधू तब्बल 18 वर्षांनी एकत्र आले. त्यांच्या या

छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी जय शिवाजी! कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला! आवाज कुणाचा? मराठीचा!!! अशा गगनभेदी घोषणांनी आणि ढोल ताशांच्या आवाजाने मुंबईचा वरळी भाग दणाणून सोडला होता. हिंदी सक्तीवर मराठी जनांच्या शक्तीने मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी जनांची पाऊले मुंबईच्या दिशेने वळली. भगवे फेटे, शेले, भगव्या पताका, मराठी फलक, लेझीम, ढोल ताशा पथक अशा दृश्यांनी वरळी परिसर सजला होता. एका बाजूला सागराला आलेलं उधाण आणि दुसऱ्या बाजूला मराठी जनसागराच्या उसणाऱ्या लाटा अशी जणू स्पर्धाच लागल्याचं चित्र आज मुंबईत पाहायला मिळालं. प्रत्येक मराठी चेहऱ्यावर अभूतपूर्व उत्साह दिसत होता. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा अनुभव यावेळी आला. महाराष्ट्रातील विविध पक्षाचे नेते, मराठी साहित्यिक, मराठी कलाकार, विविध क्षेत्रांतील मराठी मान्यवरांनी कार्यक्रमास विशेष उपस्थिती लावली. खच्चून भरलेल्या या वरळी डोम मधील जनसागराला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी ‘जमलेल्या माझ्या तमाम…’ या वाक्याने साद घालताच अंगावर शहारे आले आणि जनसागराला प्रचंड उधाण आल्याचं पाहायला मिळालं…

उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करताच सभागृहात एकच जल्लोष झाला. उद्धव ठाकरे यांनी पहिलंच वाक्य ”बऱ्याच वर्षानंतर राज व माझी भेट व्यासपीठावर झाली” हे उच्चारलं व त्यानंतर मराठी प्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या या भेटीला ग्रँड सॅल्युटल दिला. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, ”राज मला सन्मानीय उद्धव ठाकरे असं बोललेला आहे. त्याचंही कर्तुत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून आज माझ्या भाषणाची सुरुवात मी ‘सन्मानीय राज ठाकरे व जमलेल्या माझ्या मराठी हिंदू बांधवांनो व भगिनीनो व मातांनो अशी करतो. राजने भाषणाची अप्रतिम बांधणी केली त्यामुळे माझ्या भाषणाची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सहाजिकच आहे सगळ्यांचं लक्ष आमच्या भाषणाकडे होतं. पण मला असं वाटतं की आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांमध्ये जो अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. अक्षता टाकण्याची त्यांच्याकडून अपेक्षा नाहीए. पण एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच संपूर्ण डोम सभागृह टाळ्यांच्या कडकटाने दणाणून निघालं.

Comments are closed.