भारताने इंग्लंडमध्ये किती कसोटी सामने जिंकले आहेत? जाणून घ्या इतिहास घडवणारे कर्णधार!
IND vs ENG: इंग्लंडच्या भूमीवर कसोटी सामने जिंकणे हे नेहमीच भारतीय क्रिकेटसाठी खास राहिले आहे. नुकतेच एजबॅस्टन येथे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली 336 धावांच्या मोठ्या विजयामुळे भारताला मालिका बरोबरीत आणता आलीच पण एक ऐतिहासिक टप्पाही गाठता आला. इंग्लंडविरुद्धच्या या विजयाची सर्वात खास गोष्ट म्हणजे भारताने शेवटचा विजय 1967 मध्ये एजबॅस्टन येथे जिंकला होता आणि 58 वर्षांनंतर शुभमन गिलने या मैदानावर विजय मिळवून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.
इंग्लंडमध्ये कसोटी जिंकणारा शुभमन गिल हा भारताचा सातवा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी, भारताने 1971 मध्ये इंग्लंडमध्ये पहिला कसोटी सामना जिंकला होता. आतापर्यंत 54 वर्षांत भारताने इंग्लंडच्या भूमीवर 10 कसोटी सामने जिंकले आहेत.
इंग्लंडमध्ये भारताचे कसोटी विजय
- 1971 – द ओव्हल
कर्णधार – अजित वाडेकर
भारताचा इंग्लंडमधील पहिला विजय - 1986 – लॉर्ड्स आणि लीड्स
कर्णधार – कपिल देव
एकाच दौऱ्यात दोन मोठे विजय
3. 2002 – लीड्स
कर्णधार – सौरव गांगुली
भारत एक डाव आणि 46 धावांनी जिंकला
- 2007 – नॉटिंगहॅम
कर्णधार – राहुल द्रविड
भारतीय संघ 7 विकेट्सनी जिंकला - 2014- लॉर्ड्स
कर्णधार – एमएस धोनी
भारताने इंग्लंडवर 95 धावांनी विजय मिळवला - 2018 – नॉटिंगहॅम,
2021 – लॉर्ड्स आणि ओव्हल
कर्णधार – विराट कोहली
भारतीय संघाने एकूण 3 विजय मिळवले आहेत, जे इंग्लंडमधील कोणत्याही भारतीय कर्णधाराने मिळवलेले सर्वाधिक विजय आहेत. - 2025- एजबोस्टन
कर्नाधर – शुबमन गिल
58 वर्षांनंतर भारताचा इंग्लंड विरुद्धचा 10वा विजय
एजबॅस्टनच्या मैदानावर पहिला विजय.
भारताने आतापर्यंत इंग्लंडमध्ये 10 कसोटी सामने जिंकले आहेत. विराट कोहलीने यापैकी 3 कसोटी जिंकल्या आहेत, जे इंग्लंडमध्ये कोणत्याही भारतीय कर्णधाराने जिंकलेले सर्वाधिक आहेत. त्याच वेळी, शुभमन गिलने 58 वर्षांनंतर एजबॅस्टनवर भारताला विजय मिळवून देऊन इतिहास रचला आहे आणि स्वतःला दिग्गजांच्या यादीत समाविष्ट केले आहे.
Comments are closed.