Mumbai News – उपनिबंधक पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीचं टोकाचं पाऊल, राहत्या घरीत जीवनयात्रा संपवली

घरगुती भांडणाला कंटाळून म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील कांदिवली आकुर्ली परिसरात शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याप्रकरणी समता नगर पोलिसात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. रेणु कटरे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रेणु भावाने त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

रेणु या शिक्षिका होत्या तर त्यांचे पती बापू कटरे हे म्हाडामध्ये उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघा पती-पत्नीमध्ये आर्थिक कारणांवरून नेहमी वाद होत असत. शनिवारी उशिरा नेहमीप्रमाणे त्यांच्यात भांडण झाले. हे भांडण टोकाला गेले आणि त्यानंतर रेणु यांनी गळफास घेत जीवन संपवले.

बापू कटरे हे आपल्या बहिणीचा छळ करत होते. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप अ‍ॅड. नितीन शेवाळ यांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मग मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. समता नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत पुढील तपास करत आहेत. तपासाअंती सर्व स्पष्ट होईल.

Comments are closed.