चंद्रपुरात पावसाचा कहर; बामणवाडयातील अनेक घरात शिरले पाणी, प्रशासनाचे दुर्लक्ष

चंद्रपूर जिल्हात मागील जोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. बामनवाडा गावातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या बामणी ते लक्कडकोट या महामार्गावरील पूलाचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामुळे राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथील अनेक कॉलनी जलमय झाल्या आहेत. त्यामुळे हे विकासकामामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
स्नेहदीप कॉलनी, चारपत्ता गोडाऊन, स्टेलामारी कॉन्व्हेंट,तक्षशिला नगर, नालंदा नगरी,बिरसामुंडा कॉलनीला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले.अनेक घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. महामार्गाचा चुकीच्या कामामुळे पाण्याचा विसर्ग थांबल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. घरातून बाहेर पडणे नागरिकांना कठीण झाले आहे. उद्भवलेल्या परिस्थितीची प्रशासनाला वारंवार माहिती बामणवाड्यातील नागरिकांनी दिली. मात्र प्रशासनाने अद्यापही या गंभीर समस्येकडे लक्ष न दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Comments are closed.