सूर्यकुमार यादवला दंड ठोठवा अन्…; यूएईविरुद्ध सामना खेळण्याआधी पाकिस्तानने ठेवल्या 2 डिमांड,
एशिया कप 2025 इंड. पाक सूर्यकुमार यादव: आशिय चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) साखळी सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाने यूएईचा (Pak vs UAE) पराभव करत सुपर-4 मध्ये स्थान मिळवले. मात्र पाकिस्तान आणि यूएईच्या सामन्याआधी संपूर्ण दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मैदानाबाहेर प्रचंड गोंधळ घातला, कधी सामनाधिकारी बदलण्याची मागणी केली, तर कधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) दंड ठोठवण्याची मागणी केली.
यूएईविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पीसीबीने दोन मागण्या केल्या. त्यामध्ये पहिली मागणी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टला काढून टाकण्याची आणि वेस्ट इंडिजच्या रिची रिचर्डसनला पाकिस्तानच्या सामन्यासाठी रेफरी म्हणून नियुक्त करण्याची होती. तर दुसरी मागणी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवकडून दंड आकरण्याची होती. राजकीय विधान करुन सूर्यकुमार यादवने खेळाच्या भावनेचे उल्लंघन केल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं म्हणणं आहे.
पाकिस्तान आणि यूएईच्या सामन्याआधी चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. सामना सुरु होण्याआधी पाकिस्तानने आशिया चषकातून बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेतून हटविण्याची दोनदा मागणी केली. ‘आयसीसी’ने ही मागणी फेटाळल्याने पाक संघ हॉटेलमध्येच थांबून होता. पीसीबी-आयसीसी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर यूएई विरुद्ध सामन्यात पायक्रॉफ्ट हेच सामनाधिकारी राहतील, असे आयसीसीने स्पष्ट केले. यानंतर पीसीबी चेअरमन मोहसिन नकवी यांनी संघाला स्टेडियमकडे कूच करण्यास सांगितले.
अँडी पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितल्याचा पाकिस्तानचा दावा-
पीसीबीने एका निवेदनाद्वारे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तान संघ व्यवस्थापक व कर्णधाराची माफी मागितल्याचा दावा केला. पीसीबीने म्हटले की, अँडी पायक्रॉफ्ट यांनी भारत व पाकिस्तानच्या कर्णधारांना हस्तांदोलन करण्यास मनाई केली होती. अँडी पायक्रॉफ्ट यांनी 14 सप्टेंबरच्या घटनेला गैरसमज झाल्याचे सांगून माफी मागितली आहे. तसेच आयसीसीने याप्रकरणी चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे, असा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. हा सामना संपल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची चांगलीच झोंबली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने थेट आयसीसीकडे तक्रार करत सामन्यातील मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. मात्र पाकिस्तान बोर्डाची ही मागणी आयसीसीने फेटाळून लावली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यामध्ये अँडी पायक्रॉफ्ट यांची भूमिका मोठी नव्हती, असं आयसीसीनं स्पष्ट केलं.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.