मॅच आधीच पाकिस्तानचा माजी कर्णधार झाला टीम इंडियाचा फॅन; स्वतःच्या टीमचा झटकला हात? म्हणाला, का

आयएनडी वि पीएके सुपर 4 एशिया कप 2025: भारत-पाकिस्तानच्या आशिया कप सुपर-4 सामन्याला रविवारी रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे, पहिल्या सामन्यानंतर मैदानाबाहेर वाद पेटल्यामुळे या वेळचा सामना अधिक चुरशीचा होणार, अशी शक्यता आहे. पण पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ यांचे स्पष्ट मत आहे की भारत या सामन्यात फेव्हरेट आहे. लतीफ म्हणाला की, “भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे आणि आता त्याची झलक मैदानावरही दिसते. टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही दिवशी एखादी टीम चांगला खेळली तर ती जिंकू शकते. पण इतिहास पाहता भारत खूप मजबूत संघ आहे.”

IPL विरुद्ध PSL – मोठा फरक

लतीफ यांनी पाकिस्तानच्या कमजोर फलंदाजीकडे बोट दाखवत आयपीएल (IPL) आणि पीएसएल (PSL) यातील फरक स्पष्ट केला. ते म्हणाले, “भारतीय खेळाडू आयपीएलमधून उच्चस्तरीय क्रिकेट खेळतात, तर पाकिस्तानमध्ये पीएसएल खेळली जाते. या दोन्ही लीगमध्ये प्रचंड फरक आहे.” जरी भारताकडे आता रोहित, विराट, जडेजा यांसारखे ज्येष्ठ खेळाडू नसले तरी त्यांचे स्थान घेणारे तरुण आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा अनुभव मिळवून आलेले आहेत, असेही लतीफ यांनी नमूद केले.

भारताची 75% जिंकण्याची शक्यता

लतीफ यांच्या मते पाकिस्तानची फलंदाजीच त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. ते म्हणाले, “पाकिस्तान कमजोर दिसतो आणि हे सगळ्यांनाच दिसते. भारताच्या जिंकण्याची शक्यता 75 टक्के आहे, तर पाकिस्तानची केवळ 25 टक्के. पाकिस्तानला कमी लेखता येत नाही, पण त्यांची स्थिती कठीण आहे.” कर्णधार सलमान अली आगा, सॅम अयूब, मोहम्मद हारिस, साहिबजादा फरहान आणि हसन नवाज हे टॉप-ऑर्डरचे प्रमुख फलंदाज फॉर्ममध्ये नसल्याचे त्यांनी सांगितले. “जेव्हा सहापैकी पाच फलंदाज संघर्ष करत असतात, तेव्हा जिंकणे खूप कठीण होते,” असे ते म्हणाले.

कागदावर भारतच सर्वात बलाढ्य संघ, पण…

लतीफ यांच्या मते पाकिस्तानला भारतावर विजय मिळवायचा असेल, तर एखाद्या खेळाडूने अविश्वसनीय खेळी करणे हाच एकमेव मार्ग आहे. “फक्त वैयक्तिक खेळाडूची असामान्य खेळीच पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय मिळवून देऊ शकते. अन्यथा कागदावर भारतच सर्वात बलाढ्य संघ आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

हे ही वाचा –

IND Squad vs WI Test Series : ऋषभ पंत बाहेर, KL राहुल उपकर्णधार; श्रेयस अय्यरची एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी ‘या’ 15 शिलेदारांनी मिळणार संधी?

आणखी वाचा

Comments are closed.