भारताने ट्रॉफी घेण्यास नकार देताच मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला; शोएब मलिक हसला अन् म्हणाला…


एशिया कप ट्रॉफी 2025 वर शोएब मलिक: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया चषकातील जेतेपदाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा (Ind vs Pak Asia Cup 2025) दारुण पराभव केला. भारताचा डाव सुरुवातीच्या काही षटकांत डगमगला होता. परंतु तिलक वर्माच्या (Tilak Verma) जबरदस्त खेळीनं भारताचा विजयाचा मार्ग सोपा झाला. भारताने 5 विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयासह भारताने आतापर्यंत नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. दरम्यान, आशिया चषकाचा अंतिम सामना झाल्यानंतर ट्रॉफीवरुन मैदानात जोरदार राडा झाला.

एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे मोहसीन नक्वीच्या हस्ते आशिया चषकात जेतेपद पटकावणाऱ्या संघाला ट्रॉफी दिली जाणार होती. मात्र भारतीय संघाने मोहसीन नक्वीच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर साधारण 70-80 मिनिटं नाट्यमय गदारोळ झाला. भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. पण पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं उपविजेतेपदाचा धनादेश एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते स्वीकारला. त्यानंतर मोहसीन नक्वी आशिया चषकाची ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंची मेडल्स घेऊन मैदानातून (Asia Cup Trophy Controversy) निघून गेला. सदर सर्व प्रकणावर आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शोएब मलिकने (Shoaib Malik) प्रतिक्रिया दिली आहे.

शोएब मलिक काय म्हणाला? (Shoaib Malik On Asia Cup Trophy)

भारत आणि पाकिस्तानचा सामना चुरशीचा झाला. भारतीय संघाने या स्पर्धेसाठी इतकी मेहनत घेतली. आशिया चषकाची स्पर्धा जिंकली आणि ट्रॉफीच घेतली नाही. तुम्ही आज जे सेलिब्रेशन करताय, त्याबाबत तुम्हाला आता काहीच वाटणार नाही. परंतु काही दिवसांनंतर याबाबत पश्चाताप होईल, असं मत शोएब मलिकने व्यक्त केले.

नेमकं काय घडलं? (Ind vs Pak Final What happened?)

भारतीय संघाचे कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलेलं. तसंच फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं. आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळं आशिया चषकाचा पारितोषिक वितरण सोहळा तासभरापेक्षा उशिरानं सुरु झाला. तेवढा वेळ मोहसीन नक्वी हे एकटेच व्यासपीठावर उपस्थित होते.

संबंधित बातमी:

Ind vs Pak Asia Cup 2025 Final Trophy: फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, नेमकं काय काय घडलं?

Shoaib Akhter Ind vs Pak Asia Cup Final 2025: भारताने पुन्हा लोळवलं, ट्रॉफीवरुन राडा; शोएब अख्तरने पाकिस्तानला धू धू धुतलं, म्हणाला, आता थोडं…

आणखी वाचा

Comments are closed.