शासन जेव्हा संवेदनशील आणि लोकाभिमुख नसते, तेव्हा असंतोष निर्माण होतो; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाले. स्थापना दिन आणि दसऱ्याच्या निमित्ताने नागपुरात आयोजित दसरा मेळाव्याला सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले. पहलगाम हल्ला, अमेरिकेने लादलेले टॅरिफ, हिंदुस्थानच्या शेजारील राष्ट्रांमध्ये उफाळून आलेला असंतोष अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. शासन जेव्हा संवेदनशील आणि लोकाभिमुख नसते, तेव्हा असंतोष निर्माण होतो, असे विधान त्यांनी यावेळी केले.

Comments are closed.