तिसऱ्याच दिवशी संपणार पहिला कसोटी सामना? टीम इंडियाकडे इतक्या धावांची आघाडी, जडेजा शतक ठोकल्यान
India vs West Indies Live 1st Test Day 3 Latest Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दोन दिवसांचा खेळ संपल्यानंतर या सामन्यात टीम इंडियाचे वर्चस्व दिसत आहे. पहिल्या दिवशी गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी फलंदाजांचे वर्चस्व होते. आता तिसऱ्या दिवशी टीम इंडिया आपला स्कोअर वाढवण्याचा आणि मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.
टीम इंडियाचे वर्चस्व
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांना याचा फायदा उठवता आला नाही आणि त्यांचा पहिला डाव 162 धावांवर आटोपला. प्रत्युत्तर, भारतीय संघाने दुसरा दिवश अखेर 5 गडी गमावून 448 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजवर 286 धावांची आघाडी घेतली.
राहुल, जुरेल आणि जडेजा यांनी ठोकले शतक
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी शतके झळकावली. राहुलचे हे शतक घरच्या मैदानावर जवळजवळ नऊ वर्षांनी आले. राहुलने त्याचे 11 वे कसोटी शतक झळकावले, तर जुरेलचे पहिले कसोटी शतक त्याच्या बॅटमधून आले. त्यानंतर जडेजाने त्याचे सहावे शतक झळकावले.
Comments are closed.