मुंबईसह कोकणाला ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता, IMD चा इशारा

मराठवाडा, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने हाहाकार उडवून दिला. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले, घरे-जनावरे वाहून गेली. यामुळे शेतकरी संकटात असतानाच आता आणखी एक संकट घोंघावत आहे. हवामान विभागाने मुंबईसह कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा दिला आहे.

आयएमडी ट्रॉपिकल सायक्लोन ॲडव्हायजरी क्र. ०३ ने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार ‘शक्ती’ चक्रीवादळाचा राज्यातील काही जिल्ह्यांना ३ ते ७ ऑक्टोबर, २०२५ दरम्यान इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगच्या जिल्ह्यांना हे वादळ प्रभावित करु शकते. या दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे सूचित करण्यात आले आहे.

Comments are closed.