अन्याय दिसेल तिथे ढुंगणाला लाथ मारणं हे आमचं कामच आहे, उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत घेतला भाजपचा समाचार

जिथे-जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लाथ मार हे माझ्या आजोबांनी शिकवलेलं ब्रिद वाक्य माझ्या वडिलांनी ते आयुष्यभर पाळलं, तेच घेऊन मी पुढे चाललोय. अगदी काही फुटबॉलपटू होण्याची गरज नाहीये की जिकडे-तिकडे लाथ मारत फिर. पण अन्याय दिसेल तिथे ढुंगणाला लाथ मारणं हे आमचं कामच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत भाजपचा समाचार घेतला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

https://www.youtube.com/watch?v=zoybnbuj23u

आजच्या राजकारणामध्ये आणि आजच्या पत्रकारितेमध्ये अनेकजण पत्रकार म्हणून सामनामध्ये त्यांनी सुरवातीचे धडे घेतले. आणि मग इकडे तिकडे गेले. त्यातले काही तुमच्यासारखे आजही एक कृतज्ञतेची भावना ठेवून आमच्या वागत असतात. राजकारणातही तेच आहे. राजकारणासुद्धा अनेकजण शिवसेनेमध्ये तयार झाले. बोलता बोलता तुम्ही ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला. ठाकरे ब्रँड हा काही आताच जन्माला आलेला नाही. तो गेल्या पाच-सहा पिढ्यांपासूनचा महाराष्ट्राला परिचित असलेला ब्रँड आहे. पण ठाकरे ब्रँड ज्यांनी अधिक नावारुपाला आणला अर्थात माझे आजोबा आणि त्याच्यानंतर माझे वडील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि अभिमानाने सांगेत की त्या ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यामध्ये झालेला. त्यामुळे भाईयो और बहनो आपका और मेरा बहोत पुराना रिश्त है, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

पुण्याला एक वेगळी परंपरा आहे. पुणं हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं की जात होतं? कारण आता सगळीकडे मुंबई काय पुणे काय सगळी माहेरघरं ही बिल्डरांची झालेली आहेत. तरीदेखील पुण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळेपण नक्कीच आहे. आणि पत्रकार म्हटल्यानंतर आपण थेट टिळक आणि आगरकरांची आठवण काढतो. आता खरंच ती पत्रकारिता राहिली आहे का? नाही म्हटलं तरी मी सुद्धा सामनाचा संपादक आहे. कार्यकारी संपादक संजय राऊत समोर बसले आहेत. आमचे अरूण निगवेकर इथे आहेतच म्हणून मी थोडसं बोलू शकतो. तर आपल्याला तो अधिकार राहिला आहे का? की तो आपण गमावलेला आहे? कारण जेव्हा-जेव्हा आपण पत्रकारितेचा उल्लेख करतो तेव्हा टिळक आणि आगरकर. पण त्यांच्याकडून आपण काय घेतलेलं आहे. आज आपली ताकद आहे का? की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? आपल्या सरकारला विचारण्याची ताकद आणि हिंमत आपण ठेवलीय की हरवून बसलेलो आहोत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

शिवसेनेचा दसरा मेळावा अभूतपूर्व झाला. अभूतपूर्व हे केवळ माझं श्रेय नाही तर कोसळणाऱ्या पावसामध्ये एकतर शिवाजी पार्कमध्ये तळं झालं होतं. आणि त्याही चिखलात केवळ मुंबईतलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आला होता. अबालवृद्ध, महिला आल्या होत्या. स्वतःची चटणी भाकरी घेऊन आले होते. कारण आपल्याकडे बिर्याणी वैगरेची काही सोय नाही. जे येतोत ते स्वकष्टाचं असतं असे सगळे शिवसैनिक आलेले. पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जागचं हललं नाही. शिवाजी पार्कला दरवाजे नाहीत. बांधावरून उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो. त्याच्यामुळे आलेल्यांना कोंडून ठेवण्याची गरज आम्हाला कधी वाटली नाही. जी इतरांना कदाचित वाटत असेल की भाषणं सुरू झाल्यावर दरवाजे बाहेरणं बंद करतात. तशी काय आम्हाला गरज कधी वाटली नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मिंधेंचा समाचार घेतला.

मृत्युनंतरही बाळासाहेबांची विटंबना करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल, संजय राऊत यांचा रामदास कदम यांना इशारा

शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा जेव्हा झाला १९६६ ला. मी अर्थातच सहा वर्षांचा होतो. येताजाताना सर्व हालचाली बघत होतो. घरी गर्दी होतेय, शिवसैनिक येताहेत. आणि मग सभा कुठे घ्यायची? त्या चर्चेत मी सहभागी नव्हतो. पण या आठवणी शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की जेव्हा त्यांनी ठरवलं की पहिली सभा घ्यायची? कुठे घ्यायची? शिवसेनाप्रमुख म्हणाले शिवाजी पार्कला. सगळे त्यांचे मित्रमंडळी होते आणि आजूबाजूचे लोक होते ते म्हणाले तुम्हाला काय वेड लागलंय का? शिवाजी पार्क पाहिलंय का किती मोठं आहे? जरा पहिली सभा छोट्या हॉलमध्ये घ्यायला पाहिजे. नंतर एक मैदान बघू आणि असं करता करता जेव्हा आपल्याला वाटेल अंदाज येईल तेव्हा शिवाजी पार्कला घेऊ. तेव्हा बाळासाहेबांनी ताडकन सांगितलं की मी पहिली सभा शिवाजी पार्कला घेईन. बघू कोण वेडं आहे मी वेडा आहे का लोकं वेडी आहेत? आणि आता कालांतरने कळतंय की दोन्ही वेडे नव्हते. दोघंही व्यवस्थित ठरवून त्यावेळा एक दिशा ठरवली त्या दिशेने तो प्रवास मला अभिमान वाटतोय की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. आणि त्याच जिद्दीने पाऊस समोर दिसत असताना सुद्धा मी संजय आणि माझे शिवसेनेचे दोनचार नेते आम्ही बोलत होतो कुठे घ्यायचा? तर आम्ही म्हटलं परंपरा आहे आपली शिवाजी पार्क. हॉलमध्ये कसा घेणार? आणि शिवाजी पार्कला मेळावा घेतला. ही माझ्या शिवसेनेची परंपरा आहे. त्या मेळाव्यात मी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला? कितपत मला जमलं असेल कारण पाऊस होता. समोर लोकं भिजत होती. कितपत जमलं कल्पना नाही मला. पण माझा प्रयत्न हा आहे, होता आणि राहणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

केवळ माझा पक्ष सत्तेत आला पाहिजे, आला पाहिजे. पण सत्ता आल्यानंतर पुढे काय? सत्ता कशासाठी पाहिजे? का म्हणून तुम्हाला सत्तेत यायचं आहे? आणि सत्ता आल्यानंतर एवढी सगळी सत्ता असल्यानंतर सुद्धा तुम्ही देश कधी सांभाळणार आहात की नाही? राज्य म्हणून कधी सांभाळणार आहात की नाही? केवळ पक्ष म्हणून सांभाळणार आहात तुम्ही? मधल्या काळ मी असं म्हटलं होतं आणि आजही माझं मत आहे की, आपल्या देशाला आता पंतप्रधानांची गरज आहे. गृहमंत्र्यांची गरज आहे. अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे. कारण आता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसलेत, देशाचे नाहीत. देशाचे म्हणून कारभार कुठेय? ज्या सोनम वांगचुक यांचा उल्लेख मी केला आपण किती लोकं त्यांच्याबद्दल बोलतोय? किती लोकांना सोनम वांगचुक माहिती आहे? काय त्यांनी असा गुन्हा केला होता? काय म्हणून त्यांना थेट ‘रासुका’मध्ये अटक केली. काय एवढं मोठं राष्ट्रविघातक काम, काय वांगचुक यांनी चूक केली होती? काल परवापर्यंत जे पंतप्रधानांची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशप्रेमी होते. मग असं नेमकं काय घडलं? सोनम वांगचुक यांनी जर का चूक केली असेल तर मणिपूरमध्ये चूक कुणी केली होती? का पेटलं मणिपूर? आता सुद्धा आपल्याकडे बातम्या येतचं नाही. आपलं कर्तव्य आहे बातम्या दाखवणं. लडाखमध्ये काय परिस्थिती आहे? लेह लडाख खरंच शांत झालं आहे का? आसाममध्ये आदिवासी रस्त्यावर उतरले आहेत. हातामध्ये मशाली आहे. मणिपूरमध्ये आज काय चाललंय कोणाला कुठे माहिती? देशात इतरत्र काय चाललंय आपण बातम्याच देत नाही, मग खरंच आपण टिळक आणि आगरकराचं नाव घेण्याच्या लायकीचे आहोत का? हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मी माझ्या परिने काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो करत राहणार. कारण त्याला आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा. जे समोर दिसतंय जिथे-जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लाथ मार हे माझ्या आजोबांनी शिकवलेलं ब्रिद वाक्य माझ्या वडिलांनी ते आयुष्यभर पाळलं, तेच घेऊन मी पुढे चाललोय. अगदी काही फुटबॉलपटू होण्याची गरज नाहीये की जिकडे-तिकडे लाथ मारत फिर. पण अन्याय दिसेल तिथे ढुंगणाला लाथ मारणं हे आमचं कामच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

हिंदुत्व म्हणजे काय? देशप्रेम म्हणजे काय? या सगळ्या गोष्टीचा थोडक्यात परवा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला की आमच्या अंगावरती ही लोकं येतात की, तुम्ही हिंदुत्व सोडलं का? अरे तुम्ही तुमच्या वंशावळीत बघा कोणी-कोणी काय-काय सोडलं आहे. जेव्हा आम्ही भाजपच्या सोबत होतो तेव्हा आम्ही कडवट हिंदुत्ववादी होतो. आणि भाजपला आम्ही सोडलं म्हणजे काय हिंदुत्व सोडलं का? आम्ही केवळ भाजपला सोडलं म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तर मग मोहन भागवत यांनी १०० वर्षे संघाची पूर्ण झाल्यानंतर १०० वर्षे या संघाच्या पिढ्या ज्यांनी खस्ता खाल्ल्या, खपल्या आणि कष्ट घेतले त्या कष्टाला आज जी काही विषारी फळं लागली आहेत, हेच तुमचं शंभर वर्षाचं फलित आहेत का? कारण स्वतः मोहन भागवत हे मशिदीत जातात. भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांकांना सदस्य करून घेत आहेत. कधी सौगात-ए-मोदी वाटतातहेत. आम्ही काँग्रेसबरोबर गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, सौगात-ए-नेहरू कधी पाहिलं का तुम्ही? सौगात-ए-इंदिरा गांधी ऐकलं का तुम्ही? मग सौगात-ए-मोदी वाटणारे हे हिंदू कसे? असा प्रश्न करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला घेरले.

जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कुठलेही संबंध ठेवू नका, हे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं आणि तेच आम्ही परत परत सांगतोय. भाजपनेच सांगितलंय की पहलगामध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या. मग तुमच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत. आणि ज्यांनी अतिरेकी पाठवले होते त्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता? आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं, मग तुम्ही चंद्राबाबूंसोबत गेलात मग चंद्राबाबू हिंदुत्ववादी आहेत का? नितीशकुमार हिंदुत्ववादी आहेत का? भाजपने ३२ लाख मुस्लिमांना सौगात-ए-मोदी वाटली तरी भाजप हिंदुत्व वादी. याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं तर लव्ह जिहाद, असं कसं काय होऊ शकतं? हा प्रश्न विचारण्याची ताकद ही पत्रकार गमवून बसलेत का? का नाही विचारत, जर लोकमान्य टिळक इंग्रजांना प्रश्न विचारू शकत होते. तर आपणच निवडून दिलेल्या सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आपण गमवून बसलो आहोत का? आणि जोर आपण गमवून बसलो असू तर मग आपण पत्रकार म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहोत का? निदान पत्रकारांनी निष्पक्षपातीपणाने दूध का दूध पाणी का पाणी? हे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. आणि आता जे काही एक अंधभक्त हा वर्ग जन्माला आलेला आहे त्या अंधभक्तांना दृष्टी देण्याची जबाबदारी ही पत्रकारांची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Comments are closed.