पहिल्या टप्प्यातील 7 ‘बाहुबली’ लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानात


पाटणा: देशाचं लक्ष लागलेल्या बिहारच्या (Bihar election) पहिल्या टप्प्यातील १२१ जागांवर ६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यातल्या सर्वात महत्वाच्या सात लढती ज्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल… ज्यात माजी मुख्यमंत्री महाआघाडी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि राजदचे सुप्रीमो प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव (तेजस्वी यादव), लालूंचेच मोठे पूत्र आणि जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष प्रताप यादव बिहारचे अध्यक्ष डॉ भाजपमधील सर्वात मोठा चेहरा आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरींसह मैथिली ठाकूरकाँग्रेसचा आयआयटी-आयआयएम (IIT-IIM) पासआऊट शशांत शेखरसारख्या GenZ उमेदवारांचंही भविष्य मतपेटीत बंद होईल.

मतदारसंघ – तारापूर (मुंगेर)

सम्राट चौधरी (भाजप) अरुणा शहा (RJD)

सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री आणि बिहार भाजपमध्ये सर्वोच्च नेते.. तारापूर मतदारसंघ यादव, मुस्लिम, सवर्ण, कुशवाहसह आणि दलित असा मतदारांचा बहुल असल्यानं चांगली टक्कर अपेक्षित आहे. खरंतर इथं गेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं उमेदवार दिलेलाच नाहीय.. सम्राट चौधरी यांचे वडील शकुनी चौधरी यांनी २०१०, २०१५ साली निवडणूक लढवली.. मात्र, त्यांना पराभवच पटकरवा लागला होता. इथं कायम नितीश कुमाराचा जेडीयू आणि लालू प्रसाद यादवांचा राजदचाच उमेदवार आलटून पालटून जिंकलाय.. २०२१ साली इथं झालेल्या पोट निवडणुकीमध्ये राजदच्या अरुण कुमार शहा यांचा अवघ्या ३८५२ मतांच्या फरकानं पराभव झाला होता.. आणि जेडीयूचा उमेदवार जिंकून आला होता.. आताही तेच अरुण कुमार पुन्हा एकदा राजदचा कंदील हातात घेवून मैदानात उतरलेत.. नितीश कुमारांनी आपला सर्वात महत्वाचा मतदारसंघ भाजपला दिलाय.. आणि सम्राट चौधरी १५ वर्षानंतर विधानसभेची निवडणूक रिंगणात उतरलेत… भाजप, राजद, जेडीयू असा सगळ्यापक्षांमध्ये राज्य भेट करुन झाल्यानंतर २०२३साली ते पुन्हा भाजपमध्ये परतले.. आणि नितीश कुमाराच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री.

मतदारसंघ – राघोपूर (वैशाली)

तेजस्वी यादव (राजद) विरुद्ध सतीश कुमार (भाजप)

महाआघाडी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि राजदचे प्रमुख लालू यादव यांचे पूत्र तेजस्वी यादवांचा मतदारसंघ असल्यानं राघोपूर मतदारसंघ आधीच महत्वाचा बनलाय. २०१५ पासून तेजस्वी यादव राघोपूरचे आमदार आहेत.. मतदारसंघ यादव बहुल असल्यानं राखले राजदचाच वरचष्मा राहिलाय.

मतदारसंघ – महुआ (वैशाली)

तेज प्रताप यादव (जेडी) मुकेश कुमार रोशन (राजद) विरुद्ध

राजदमधून हकालपट्टी केल्यानंतर लालुचे मोठे पूत्र आणि तेजस्वी यादवांचे मोठे बंधू तेज प्रताप यांनी जनशक्ती जनता दलाची स्थापना केली.. आणि त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या महुआमधून उमेदवारी अर्जही भरला.. इथली लढत सर्वात जास्त कठीण आणि चर्चेत राहील कारण, 2015 साल तेज प्रताप यादव महुचे आमदार बनले.. मात्र, २०२० साली त्यांना हसनपूर आणि त्यांच्याठिकाणी महुआतून मुकेश रोशन यांना उमेदवारी मिळाली.. त्यामुळे २०२० साली तेज प्रताप हसनपूरचे आता आमदार होते. राजदच्या त्याच मुकेश कुमार रोशन यांचंच आव्हान तेज प्रताप यांना असणार आहे.

मतदारसंघ – अलीनगर (दरभंगा)

मैथिली ठाकूर (भाजप) विरुद्ध बिनोद मिश्रा (राजद)

लोक गायक मैथिली ठाकूरला भाजप ऐनवेळी पक्षात घेवून उमेदवारी दिल्यानं पक्षातूनच विरोध झाला होता.. विरोधकांनीही आयात उमेदवार नको.. असा प्रचार केला.. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैथिली ठाकूरसाठी मध्यवर्ती गृहमंत्री अमर्याद शाहांनी प्रचारसभा घेतले… दरभंगा जिल्ह्यात लालू प्रसाद यादवांच्या राजदचाच बोलबाला राहिलाय.. त्यातही अलीनगर मध्ये राखले राजदचा आमदार निवडून आलाय.. राजदचा बालेकिल्ला ध्वस्त करण्यात मैथिली ठाकूरला यश येतं का हे १४ तारखेलाच कळेल.

मतदारसंघ – लखीसराय (लखीसराय)

विजय कुमार सिन्हा (भाजप) विरुद्ध रवि कुमार (जेएसपी).

भाजपचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, उपमुख्यमंत्री, विधानसभेचे माजी चेअरमनमाजी विरोधी पक्षनेते.. अशा सगळ्यापदांवर राहिलेल्या विजय कुमार सिन्हा यांचा मतदारसंघ.. गेल्या दोन दशकांपासून भाजपचा गड असलेल्या लखीसराय माधों विजय कुमार सिन्हा सलग तीन वेळा आमदार आहेत.. सवर्णांसह भूमिहार मतदारांचं वर्चस्व असल्यानं इथं कायम भाजपाचा आमदार राहिलाय.

मतदारसंघ – रघुनाथपूर (सिवान)

ओसबा शहाब (राजदविकास कुमार सिंग विरुद्ध (जेडीयू)

बाहुबली, माजी खासदार आणि कुख्यात गुंड आणि सिवान जिल्ह्यात दहशत असलेल्या मोहम्मद शहाबुद्दीनचा गड म्हणजे रघुनाथपूर.. २०२१ साली शहाबुद्दीनचा मृत्यू झाला.. त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी राजदंड शहाबुद्दीन यांच्या मुलगा ओसामा शहाबाला उमेदवारी दिलीय.. तर तिकडे नितीश कुमारांच्या जेडीयूनं विकास कुमार सिंह यांना उमेदवारी दिलीय.

मतदारसंघ – आऱ्हा (भोजपूर)

संजय सिंह “टायगर” (भाजप) विरुद्ध विजय कुमार गुप्ता (JSP) आणि कय्युमुद्दीन अन्सारी (सीपीआय-एमएल).

आऱ्हा मतदारसंघ इथल्या हिंसाचारासाठीच ओळखला जातो.. राजपूत विरुद्ध वैश्य असा संघर्ष कायम मतदानाच्या केंद्रस्थानी राहिलाय. २०१० सालापासून इथं प्रत्येकवेळी आमदार वेगवेगळ्याच पक्षांचा राहिलाय.. प्रामुख्यानं भाजप आणि राजदमध्ये ही लढत व्हायची.. यंदा मात्र डाव्याचे उमेदवार कय्युमुद्दीन अन्सारींना पाठींबा जाहीर केलाय..

मतदारसंघ – पटना साहिब (पाटणा)

रत्नेश कुशवाह (भाजप) विरुद्ध शशांत शेखर (काँग्रेस).

राजधानीच्या मधोमध असलेला मतदारसंघ २०१० पासून भाजपाचाच आमदार राहिलाय. नंद किशोर यादव इथं २०१०पासून आमदार आहेत.. मात्र, यावेळी भाजपनं नवा चेहरा दिलाय.. त्यामुळेही मतदारसंघ चर्चेत आलाय.. दुसरीकडे काँग्रेसनं आयआयटी-आयआयएम (IIT-IIM) पासआऊट शशांत शेखरसारख्या GenZ उमेदवारांला मैदानात उतरवलंय.

हेही वाचा

राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती होणार की नाही? बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ठरलं, वरिष्ठांच्या बैठकीत निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.