स्फोटानंतर खेळाडू घाबरले, पण श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाची धमकी, परत आलात तर याद राखा…


इस्लामाबाद स्फोट पाक विरुद्ध Sl 2 रा ओडी : इस्लामाबादमध्ये झालेल्या स्फोटानंतर पाकिस्तानातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. याच दरम्यान, पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका क्रिकेट संघाने स्वतःच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली असून अनेक खेळाडू तत्काळ स्वदेश परतण्याच्या तयारीत आहेत. मात्र, श्रीलंका क्रिकेट मंडळाने (SLC) खेळाडूंना कठोर इशारा दिला आहे. “जर कोणी खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ पाकिस्तान सोडून परतला, तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील.”

स्फोटानंतर खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण

मंगळवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या कार बॉम्ब स्फोटामुळे श्रीलंकेच्या संघात मोठी खळबळ उडाली. स्फोटाच्या वेळी पाकिस्तानी संघही त्या परिसरातच थांबलेला होता. यानंतर श्रीलंकेचे आठ खेळाडू आणि काही सपोर्ट स्टाफ सदस्यांनी त्वरित स्वदेश परतण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडत चालली आहे आणि तिथे राहणं आता धोकादायक ठरत आहे.

श्रीलंका क्रिकेटचा कठोर निर्णय

खेळाडूंच्या या मागणीला श्रीलंका क्रिकेट मंडळाने फेटाळून लावलं आहे. श्रीलंका क्रिकेटचं म्हणणं आहे की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि स्थानिक प्रशासनाने पुरेशी सुरक्षा हमी दिली आहे, त्यामुळे परत जाण्याची गरज नाही. बोर्डानं इशारा दिला आहे की जर कोणी खेळाडू आदेशाचे उल्लंघन करून पाकिस्तान सोडेल, तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आणि औपचारिक चौकशी होईल.

खेळाडूंचा दबाव वाढला

सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीलंकन खेळाडू दिवसभर पाकिस्तान सोडण्याचा आग्रह धरत होते. त्यांनी संपूर्ण दौरा रद्द करण्याचीही मागणी केली आहे. या दौऱ्यात श्रीलंकेनं आतापर्यंत फक्त एक वनडे सामना खेळला असून अजून दोन सामने बाकी आहेत. त्यानंतर त्यांना पाकिस्तानमध्ये झिंबाब्वेविरुद्ध त्रिकोणी टी-20 मालिका खेळायची आहे.

पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील दुसरा ODI सामना कधी होणार?

खेळाडूंच्या चिंतेमुळे रात्री उशिरा श्रीलंका क्रिकेट टीम मॅनेजमेंट आणि पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांची दीर्घ बैठक झाली. त्यानंतर उरलेले दोन वनडे सामने एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहेत. PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी सांगितलं की आता हे सामने 14 आणि 16 नोव्हेंबरला खेळले जातील.

पाकिस्तानची पुन्हा बदनामी

गेल्या काही वर्षांत वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे अनेक देशांनी पाकिस्तान दौरे रद्द केले होते. आता श्रीलंका संघही असुरक्षित असल्याचं सांगत असल्याने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विश्वासार्हता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली आहे.

हे ही वाचा –

Rohit Sharma-Virat Kohli : मी खेळणार… रोहित शर्माची घोषणा! पण BCCI च्या सूचनेनंतरही विराट कोहली लंडन सोडायला तयार नाही? अहवालात खुलासा

आणखी वाचा

Comments are closed.