तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गंभीर म्हणाला


गौतम गंभीर राजीनाम्यावर भारत विरुद्ध एसए दुसरी कसोटी: दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण अफ्रिकेने भारताचा 2-0 अशा फरकाने पराभव (India vs South Africa 2nd Test) केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात (Ind vs SA 2nd Test) दक्षिण आफ्रिकेनं भारताला 408 धावांनी पराभूत केलं. 549 धावांचं आव्हान गाठताना भारत 140 धावांतच गारद झाला. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या या लाजीरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीर (Gautam Gambhir) पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिला. यावेळी मी पराभव स्वीकारतो, असं गौतम गंभीरने (Gautam Gambhir On Resignation) स्पष्ट केले.

गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने 18 पैकी 10 कसोटी सामने गमावले आहेत, ज्यात गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध आणि आता घरच्या मैदानावर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पराभवाचा समावेश आहे. गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव हा धावांच्या फरकाने सर्वात मोठा कसोटी पराभव आहे. पत्रकार परिषदेत तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात का?, असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. यावर गौतम गंभीर म्हणाला की, याबाबत बीसीसीआय निर्णय घेईल. पण मी तोच व्यक्ती आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि आशिया कप जिंकला. पण तुम्ही लवकर विसरले, असं गौतम गंभीरने उत्तर दिले.

सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी सर्व प्रयत्न करतोय- गौतम गंभीर (Gautam Gambhir On Team India)

मी याआधीही सांगितले आहे की, टीम इंडियाचा हा असा संघ आहे, ज्याच्याकडे अनुभव कमी आहे आणि या संघाला सतत शिकत राहण्याची गरज आहे. सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे, असं गौतम गंभीरने सांगितले. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी गौतम गंभीरनं स्वीकारली आहे. दोष सर्वांचा पण सुरुवात माझ्यापासून करा, असंही गौतम गंभीरने म्हटलं आहे. कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला अत्यंत प्रतिभावान क्रिकेटपटूंची आवश्यकता नाही. आम्हाला मर्यादित कौशल्ये आणि मजबूत मानसिकता असलेल्या खेळाडूंची आवश्यकता आहे, असं गौतम गंभीरने सांगितले.

भेट कशी झाली? (भारत वि एसए दुसरी कसोटी)

पहिल्या डावात 288 धावांची दमदार आघाडी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं दुसरा डाव 260/5 वर घोषित केला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 549 धावांचं लक्ष्य ठेवलं गेलं. दुसऱ्या डावात ट्रिस्टन स्टब्स 93 धावांनी शतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला. त्याचा विकेट पडताच बावुमानं डाव घोषित केला. आणि दुसऱ्या डावात भारताला 140 धावांत गुंडाळले आणि 408 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा कसोटीतील आणि घरच्या मैदानावर धावांच्या फरकाने सर्वात मोठा पराभव आहे. याआधी 2004 मध्ये नागपुरात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने 342 धावांनी पराभव केला होता.

संबंधित बातमी:

Gautam Gambhir On Resignation Ind vs SA 2nd Test मोठी बातमी: दोष सर्वांचा, पण सुरुवात माझ्यापासून; मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, राजीनाम्यावर गौतम गंभीरचं मोठं विधान

आणखी वाचा

Comments are closed.