संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला वर्ष पूर्ण, कृष्णा आंधळे अद्यापही सापडला नाही; न्यायालयात १२ डिसेंबरला पुन्हा सुनावणी

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. एक वर्षाचा कालावधी लोटला तरीही त्यांच्या हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही पोलिसांना सापडला नाही. या प्रकरणी न्यायालयाने तपास यंत्रणेला विचारणा करून कृष्णा आंधळे का सापडत नाही याचा अहवाल सादर करा अशा सूचना दिल्या. या घटनेतील पुढची सुनावणी आता १२ डिसेंबरला होणार आहे. त्यावेळी आरोपींवरील आरोप निश्चित होवू शकतात.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येला तब्बल एक वर्षे पूर्ण झाले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. बीड येथील विशेष मकोका न्यायालयात विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. घटनेतील फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडत नसल्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना देखील तपास यंत्रणेला विशेष न्यायालयाने दिल्या. तपास पथकाने वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतिक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे यांच्यवर अपहरण आणि खंडणीचा ठपका ठेवला. या प्रकरणाची सुनावणी मकोका न्यायालयामध्ये सुरू आहे. न्यायालयात विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी विष्णू चाटे याचा या प्रकरणात कसा सहभाग आहे. याबाबतचे पुरावे न्यायालयासमोर आणले. त्यावेळी या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने लक्ष वेधत तपास यंत्रणेकडे विचारणा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणी पुढील सुनावणी १२ डिसेंबरला होणार आहे त्या दिवशीच आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.