IND vs NZ: अभिषेक शर्माच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा 48 धावांनी पराभव करत मालिकेत विजयी सुरुवात केली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना बुधवार, 21 जानेवारी रोजी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि धावसंख्या २७ धावा होईपर्यंत संजू सॅमसन (१०) आणि इशान किशन (८) पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर अभिषेक शर्माने एक टोक सांभाळताना कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 99 धावांची तुफानी भागीदारी केली.
Comments are closed.