चौकार-षटकारांचा पाऊस पडणार की गोलंदाज गाजवणार मैदान? जाणून घ्या खेळपट्टीचा अंदाज

​टी-२० वर्ल्ड कप २०२६ ची सुरुवात धमाकेदार विजयाने केल्यानंतर, भारतीय संघ आपल्या पुढच्या सामन्यात नामीबियाशी भिडणार आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवचा अपवाद वगळता भारताची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली होती. मात्र, गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत अमेरिकेला लक्ष्यापासून २९ धावा दूर रोखले होते. नामीबियाविरुद्धच्या सामन्यात संघ व्यवस्थापनाला आपल्या फलंदाजांकडून धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा असेल. दुसरीकडे, नामीबियाचा संघही भारतीय संघाला तगडे आव्हान देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

​भारत आणि नामीबिया यांच्यातील स्पर्धेतील १८ वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावर सहसा फलंदाजांची चंगळ असते. चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो आणि चौकार-षटकारांचा पाऊस पडतो. अरुण जेटली स्टेडियमची बाउंड्री (सीमारेषा) देखील खूप लहान आहे, ज्याचा पुरेपूर फायदा फलंदाज घेतात. मात्र, या स्पर्धेत येथे फिरकी गोलंदाजही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. दिल्लीच्या या मैदानावर चेंडूला चांगली वळण (टर्न) मिळत आहे.

​दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमने आतापर्यंत एकूण १५ सामन्यांचे यजमानपद भूषवले आहे. यापैकी केवळ ५ सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे, तर १० सामन्यांत पाठलाग करणाऱ्या (चेस करणाऱ्या) संघाने बाजी मारली आहे. म्हणजेच या मैदानावर धावांचा पाठलाग करणे अधिक सोपे राहिले आहे. भारत आणि नामीबिया यांच्यातील सामन्यात टॉस जिंकल्यानंतर कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना दिसू शकतो. येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १४५ आहे, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या १३४ आहे.

च्याअभिषेक शर्मा पोटाच्या त्रासाने त्रस्त असून नामीबियाविरुद्धच्या सामन्यात त्याचे खेळणे कठीण दिसत आहे. अभिषेकची बिघडलेली प्रकृती पाहता त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. असे मानले जात आहे की, अभिषेकच्या जागी नामीबियाविरुद्ध संजू सॅमसनला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळू शकते.

Comments are closed.